आता आम्हाला कोरोनाला बरोबर घेऊनच वाटचाल करावी लागणार आहे. ही वाटचाल करताना स्वतःचा बचाव करण्यासाठी प्राधान्य द्यायचे आहे. जगभरातील इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशाचा व देशभरातील इतर राज्यांच्या तुलनेत कर्नाटकात कोरोनाचा फैलाव आटोक्मयात आहे.
एकीकडे कोरोना महामारीचा फैलाव वाढतो आहे तर दुसरीकडे उन्हाच्या चटक्मयांबरोबरच कर्नाटकात अनेक जिल्हय़ात पाणीटंचाई भासू लागली आहे. टंचाईग्रस्त नऊ जिल्हय़ातील 138 गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर आणखी चौदा जिल्हय़ातील पाणीसमस्या दूर करण्यासाठी सरकारने 372 खासगी कूपनलिका भाडेतत्त्वावर घेऊन पाणीपुरवठा सुरू केला आहे. यंदा मोसमी पावसाचे आगमन लवकर होणार आहे, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. मे अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवडय़ात कर्नाटकात नैर्त्रुत्य मोसमी पाऊस दाखल होईल, अशी शक्मयता वर्तविण्यात आली आहे. काही जलाशये वगळता कर्नाटकातील बहुतेक जलाशयांमध्ये अद्याप पाणीसाठा आहे. गेल्या वषीच्या तुलनेत यंदा 10 टक्के अधिक वळीव पाऊस बरसला आहे. त्यामुळे साहजिकच भूजल पातळी टिकून आहे. बहुतांश गावांना पाणीसमस्या भेडसावणार नाही, अशी स्थिती आहे.
कर्नाटकात कोरोना रुग्णांची संख्या एक हजाराची मर्यादा ओलांडणार आहे. गुरुवारी सकाळी आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये बाधितांची संख्या 981 इतकी होती. शुक्रवारपर्यंत हा आकडा हजाराची पातळी ओलांडणार आहे. आतापर्यंत कोरोनाने 35 जणांचा मृत्यू झाला आहे तर बरे होणाऱयांची संख्याही चांगली आहे. 981 पैकी गुरुवारी दुपारपर्यंत 456 जण बरे झाले आहेत. त्यांना घरीही पाठविण्यात आले आहे. बेळगाव जिल्हय़ाचा क्रमांक दुसरा आहे. बेंगळूरनंतर याच जिल्हय़ाची वर्णी लागते. 116 रुग्णसंख्या असलेल्या बेळगावात नवी दिल्ली येथील निजामुद्दिन मरकज धर्मसभेत भाग घेतलेल्या तबलिगींमुळे संसर्गाला सुरुवात झाली. आता राजस्थानमधील अजमेर दर्ग्याहून परतलेल्या 30 भाविकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 22 जण बेळगाव जिल्हय़ातील तर 8 जण बागलकोट जिल्हय़ातील आहेत. या सर्व 30 जणांना बेळगाव जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. कुडची, ता. रायबाग, हिरेबागेवाडी, ता. बेळगाव या दोन गावात कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. उपचाराअंती कोरोनामुक्त झालेल्या कुडची येथील एका 55 वषीय इसमाला घरी जाऊ देण्यात आले होते. आता त्याला पुन्हा कोरोनाची बाधा झाली आहे.
तबलिगी, अजमेर कनेक्शननंतर गुरुवारी मुंबईहून परतणाऱयांमध्ये कोरोनाची लागण आढळून आली आहे. गेल्या आठवडय़ात बेळगाव शहरातील एक 27 वषीय महिला मुंबईहून बेळगावला आली आहे. ती गरोदर आहे. बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. प्रशासनाने कोरोना थोपविण्यासाठी अनेक उपाययोजना राबविल्या आहेत. नागरिकांचा सुरुवातीला असलेला प्रतिसाद आता दिसून येत नाही. परराज्यातून कर्नाटकात येणारे किंवा कर्नाटकातून परराज्यात जाणाऱयांनी आपली आरोग्य तपासणी सक्तीने करून घेण्याचा दंडक घालण्यात आला आहे. एखाद्या राज्यात जाताना किंवा तिकडून येताना संबंधित राज्याकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. असे असूनही लोक चोरमार्गाने बेळगावात शिरण्याचे प्रकार काही थांबले नाहीत. आता अशा लोकांमुळे कोरोना वाढतो आहे.
त्यामुळेच प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतली आहे. आणखी कठोर होण्याची गरजही निर्माण झाली आहे. याचा फटका काहींना बसत आहे. मात्र, कठोर भूमिका घेतल्याशिवाय कोरोना थोपविणे शक्मय नाही. गेल्या आठवडय़ात मंडय़ा जिल्हय़ातील एका 35 वषीय महिलेचा पुण्यात मृत्यू झाला. हृदयाघाताने मृत्यू झालेल्या या महिलेवर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्याची कुटुंबीयांची इच्छा होती. त्यामुळे त्या महिलेचा पती, 6 वर्षाची मुलगी आणि वृद्ध वडिलांनी तिचा मृतदेह पुण्याबाहेर काढला. बेळगाव जिल्हय़ाच्या सीमेवर तब्बल दोन दिवस या महिलेचा मृतदेह वाहनातच होता. गेल्या रविवारी 10 मे रोजी मध्यरात्री कोगनोळी जवळील गायरान जमिनीवर त्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोना तपासणी झाली नाही म्हणून कर्नाटक सरकारने त्यांना राज्यात प्रवेश नाकारला होता. कोरोना आणि त्यामुळे झालेले लॉकडाऊन, राज्या-राज्यांच्या सीमेवर केले गेलेले सीलडाऊन, त्यामुळे आपले गाव गाठण्यासाठी कुटुंबीयांच्या ओढीने बाहेर पडलेल्या हजारो नागरिकांना जिल्हय़ांच्या, राज्यांच्या सीमेवर अडकून पडावे लागले आहे. पूर्वी काम शोधण्यासाठी लोक खेडय़ातून शहरांकडे जायचे, आज जीव वाचविण्यासाठी त्याच शहरांना सोडून ते खेडय़ाला जायला निघाले आहेत. कोरोनामुळे अशी अनेक स्थित्यंतरे घडत आहेत.
17 मे नंतर लॉकडाऊन-4 सुरू होणार आहे आणि त्याचे स्वरुप कसे असेल, याबाबत जनतेत औत्सुक्स आहे. 25 मार्चपासून लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. आता लॉकडाऊन-3 काही अंशी शिथिल करण्यात आला आहे. तीन झोनमध्ये विभागणी करून रेड झोनवगळता ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये जनजीवन सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. चौथ्या लॉकडाऊननंतरही कोरोनाचा पूर्णपणे नायनाट होईल, याची शाश्वती नाही. सरकारने कोरोनाबद्दल भरपूर जागृती केली आहे. आता आम्हाला कोरोनाला बरोबर घेऊनच वाटचाल करावी लागणार आहे. ही वाटचाल करताना स्वतःचा बचाव करण्यासाठी प्राधान्य द्यायचे आहे. जगभरातील इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशाचा व देशभरातील इतर राज्यांच्या तुलनेत कर्नाटकात कोरोनाचा फैलाव आटोक्मयात आहे. यंदा लग्नसराई लग्नांविनाच गेली. जी थोडीफार कोरोनाच्या काळात झाली ती सरकारी नियमानुसार 15 ते 20 जणांच्या साक्षीने पार पडली. कष्टकरी, कामगार घरातच बसले. सरकारने त्यांच्यासाठी पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजमध्ये अनेक घटकांचा समावेश नाही. केंद्र सरकारने तर 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे.
वैज्ञानिकांच्या आणि तज्ञ डॉक्टरांच्या मते अद्याप लॉकडाऊन शिथिल करायचे नव्हते. आयसीएमआरने (इंडियन कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च) लॉकडाऊन शिथिल करण्यासाठी काही मानदंड ठरविले होते. कोरोनाबाधितांचा शोध घेण्यासाठी प्रत्येक जिल्हय़ात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करावे, स्वॅब तपासणी अहवाल यायचीही प्रतीक्षा न करता ज्यांच्यामध्ये लक्षणे आढळून आहेत अशांना क्वारंटाईनमध्ये धाडले जावे, सुमारे 40 टक्क्मयांहून अधिक रुग्णसंख्येत घट झाली असेल किंवा कोरोनाची प्रकरणे समर्थपणे हाताळण्याची व्यवस्था आपल्याजवळ असेल तरच लॉकडाऊन शिथिल करण्याचा सल्ला आयसीएमआरने दिला होता. हा सल्ला डावलून लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. आरोप-प्रत्यारोप काही असले तरी कोरोना महामारी थोपविण्यासाठी प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी पार पाडायची गरज आहे. कारण शेवटी माणूस आणि माणुसकी जगली पाहिजे. सध्या कामगारांची अवस्था बिकट आहे. त्यांना सावरायचे आहे. परिस्थितीत सुधार येण्यासाठी सर्वांनीच एकदिलाने झटणे काळाची गरज आहे.