अडीच महिन्यात उपनोंदणी कार्यालयात 1510 खरेदी-विक्री व्यवहार
गंगाधर पाटील / बेळगाव
कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले होते. तरीदेखील कोरोना काळात बेळगावमधील मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार बऱयापैकी झाले. मार्च अखेरपासून जूनच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत एकूण 1510 खरेदी-विक्री व्यवहार पूर्ण झाले. त्यामधून सरकारला 4 कोटी 54 लाख 86 हजार 848 रुपये कर मिळाला आहे. याचबरोबर नोंदणी शुल्क 96 लाख 53 हजार 875 रुपये मिळाले आहे, अशी माहिती उपनोंदणी अधिकाऱयांनी दिली आहे. त्यामुळे कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला असताना ही झालेली उलाढाल काही प्रमाणात राज्य सरकारला तारक ठरली आहे.
कोरोनामुळे देशाच्या आर्थिक घडीची चाके थांबली होती. लॉकडाऊनमुळे हे साहजिकच होते. मात्र, यामुळे राज्याबरोबरच केंद्र सरकारचे कर मिळण्याचे स्रोत पूर्णपणे काही दिवस थांबले. सरकारला कर जमविण्यासाठी कसरत करावी लागत होती. कराचे स्रोतच थांबले होते. उपनोंदणी कार्यालयामध्ये मात्र खरेदी-विक्रीचे व्यवहार काही दिवस वगळता सुरू होते. त्यामुळे राज्याला बऱयापैकी बेळगाव उपनोंदणी कार्यालयातून कर मिळाला आहे, हे या आकडेवारीवतून दिसून येत आहे.
लॉकडाऊनमुळे राज्य आणि केंद्र सरकारचे उत्पादनच थांबले होते. त्यामुळे सरकार अडचणीत आले. नेमके काय करायचे? हेच समजत नव्हते. तरीदेखील तारेवरची कसरत केंद्र आणि राज्य सरकारने केली. उपनोंदणी कार्यालयाबाबत बऱयाच वेळा तक्रारी केल्या जात आहेत. बेळगाव जिह्यातील सर्वात अधिक महसूल देणारे हे कार्यालय लॉकडाऊनमुळे काही दिवस बंद ठेवावे लागले होते. तरीदेखील सोशल डिस्टन्स ठेवत येथील व्यवहार सुरू होते.
खरेदी-विक्री करताना मोठय़ा प्रमाणात स्टॅम्पडय़ुटी सरकारला मिळत असते. खरेदी-विक्रीची दररोजच मोठी उलाढाल होत असते. उपनोंदणी कार्यालयामधून हे सर्व व्यवहार केले जातात. त्यामुळे नेहमीच उपनोंदणी कार्यालयामध्ये मोठी गर्दी होत असते. हे कार्यालयदेखील अत्यंत अरुंद जागेमध्ये आहे. त्यामुळे अनेकांनी या कार्यालयाबद्दल तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्यानंतर सोशल डिस्टन्स ठेवत काही मोजक्मयाच व्यक्तींना आत प्रवेश देण्यात येत होता. याचबरोबर सध्यादेखील काही मोजक्मयाच व्यक्तींना आत प्रवेश देऊन खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू आहेत.
गेल्या अडीच महिन्यांमध्ये 1510 खरेदी व्यवहार पूर्ण झाले. याचबरोबर विवाह नोंदणी, बोजा प्रमाणपत्र ही कामेदेखील झाली आहेत. यातूनच जवळपास 1 कोटीच्या आसपास शुल्क या कार्यालयाला मिळाले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये शुल्कामध्ये बऱयाच प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे अधिक कर सरकारला मिळत असल्याचे सांगण्यात आले. नोटाबंदीनंतर हे व्यवहार कमी झाले होते. त्यानंतर पुन्हा काही प्रमाणात त्यामध्ये वाढ झाली. त्यानंतर अचानक कोरोनाचे संकट आले. त्यामुळे मोठा फटका बसला आहे. तरीदेखील इतर जिल्हा व राज्याच्या तुलनेपेक्षा बेळगावमध्ये अधिक प्रमाणात व्यवहार झाले आणि राज्य सरकारला करदेखील मोठा मिळाला आहे.
ऑनलाईनच्या माध्यमातून हे सर्व व्यवहार केले जातात. बऱयाच वेळा सर्व्हर डाऊनचा फटका कर्मचाऱयांसह ग्राहकांनाही बसत आहे. मात्र, त्याला कर्मचारी काहीच करू शकत नाहीत. आतापर्यंत जनतेने सहकार्य केले आहे. यापुढेही अशाच सहकार्याची अपेक्षा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोनामुळे प्रत्येकाने सुरक्षित अंतर ठेवून व्यवहार करावेत, असे उपनोंदणी अधिकारी विष्णुतीर्थ यांनी सांगितले. कार्यालय हे अत्यंत कमी जागेत आहे. असे असले तरी आम्ही कोरोनामुळे सर्व नियोजन केले आहे. बऱयाच वेळा तक्रारी होत असल्या तरी त्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आतापर्यंत प्रयत्न केले आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.