शाहूपुरी (सातारा) : दीपावलीनंतर सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळेप्रशासन देखील कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. प्रशासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठीपूर्वीप्रमाणे निर्बंध आणखीन कठोर करावे, मात्र पुन्हा लॉकडाऊन कोणोलाही न परवडणारा आहे, अशी भूमिका सातारकरांनी घेतली आहे.
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. दररोज ८०० ते १००० रुग्ण आढळून येत होते. तर ५० ते७० रुग्ण दगावत होते. दिवाळीपूर्वी ही रुग्णसंख्या आटोक्यात आली. मात्र, दिवाळीनंतर यात पुन्हा वाढ होऊ लागली. गेल्या पंधरा दिवसांत जिल्ह्यातअडीच हजार नवे रुग्ण आढळले तर ८९ जणांचा मृत्यू झाला. तर महिनाभरात ४६६१ रुग्ण आढळले असून, १८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासन ठोस पावले उचलण्याच्या तयारीत आहे; परंतु प्रशासनाने पूर्वीप्रमाणे निर्बंध कठोर करावेत; परंतु लॉकडाऊन पर्याय निवडू नये, अशी भूमिका नागरिकांनी घेतलीआहे.