आजवर कुठल्याही वरि÷ अधिकाऱयाला लागण झाल्याचे समोर आलेले नाही. एकीकडे सरकारी यंत्रणेचा भोंगळपणा तर दुसरीकडे कोरोनाबद्दलही समाजात बळावलेल्या अंधश्रद्धा यामुळे फैलाव वाढतो आहे.
कर्नाटकात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. परराज्यातून आलेल्यांमुळे रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. कोरोना थोपविण्यासाठी व नियंत्रणात ठेवण्यासाठी राबविलेल्या गेलेल्या उपाययोजनांमुळे देशातील चार अव्वल शहरांमध्ये बेंगळूरची गणना झाली आहे. चेन्नई, जयपूर, इंदूर व बेंगळूरने ज्या पद्धतीने परिस्थितीची हाताळणी केली ती पद्धत आदर्शप्राय आहे. देशातील इतर शहरांनीही त्याचे अनुकरण करावे, असे सांगत केंद्र सरकारने कर्नाटकाची पाठ थोपटली आहे. एकीकडे कोरोना रुग्णसंख्येत रोज 100 ते 200 ने वाढ होत चालली आहे तर दुसरीकडे उत्तर कर्नाटकात उन्हाचा तडाखा वाढला आहे. वाढत्या उष्म्यामुळे लोकांना घराबाहेर पडणेही कठीण होत चालले आहे. चार दिवसांपूर्वी विजापूरचा पारा 45.3 डिग्री इतका होता. बेळगाव, बागलकोट, विजापूर, गुलबर्गा, हुबळी-धारवाड आदी उत्तर कर्नाटकातील जिल्हय़ात झळा बसू लागल्या आहेत.
कोरोना, क्वारंटाईन, स्वॅब तपासणी, सेवासिंधू, आरोग्य सेतू आदी शब्द दैनंदिन जीवनात रूढ होऊ लागले आहेत. सरकारच्या काही चुकीच्या धोरणांमुळे परराज्यातून आलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. काही बाबतीत सुटसुटीत तर काही बाबतीत किचकट नियम आखून देण्यात आले आहेत. क्वारंटाईनचा घोळ संपता संपेना. कोरोना थोपविण्यासाठी दोन प्रकारच्या क्वारंटाईनची व्यवस्था आहे. परराज्य व परदेशातून आलेल्यांना 14 दिवसांचे संस्थात्मक क्वारंटाईन सक्तीचे करण्यात आले होते. पैसे खर्च करण्याची तयारी असेल तर त्यांना लॉजमध्ये ठेवले जाते. ज्यांना हा खर्च परवडत नाही त्यांना मंगल कार्यालय, विद्यार्थी वसतीगृहात ठेवले जाते. आता हा 14 दिवसांचा अवधी 7 दिवसांवर आणला आहे. उर्वरित 7 दिवस घरीच राहण्याचा सल्ला दिला जातो. हा निर्णय झाला खरा, पण त्याची अंमलबजावणी अद्याप सुरू नाही. त्यामुळे सरकारचे धोरण असे असताना तुम्ही 14 दिवस आम्हाला हॉटेलमध्ये का डांबून ठेवता, असा संतप्त सवाल परराज्यातून आलेले नागरिक प्रशासनाला करीत आहेत. केंद्र सरकारने ज्या यंत्रणेचे कौतुक केले ती यंत्रणा इतक्मया गोंधळात आहे की कुठल्याच गोष्टीचे सरळसोपे काहीच नसून सर्वच गुंतागुंत पहायला मिळते.
जणू ही वेळ आरोग्य आणीबाणीच असल्यामुळे अधिकाऱयांना प्रश्न विचारायचेही मुश्कील झाले आहे. कोरोनाच्या काळात कर्नाटकात अधिकारीशाही माजली आहे. मास्क, सॅनिटायझर व संरक्षण सामग्री खरेदीच्या नावाने या अधिकाऱयांनी लूट चालविली आहे. सरकारला कोटय़वधीचा हिशेब दाखवायचा आणि दानशूरांच्या मदतीने ती सामग्री मिळवून तिचे वाटप करायचे, असा सपाटा सुरू आहे. भ्रष्टाचारात माजलेल्या अधिकारीशाहीला वेळ कसलीही असो ते आपला हिस्सा हा काढणारच! अनेकांच्या बाबतीत कोरोनाचे संकट फायद्याचे ठरले आहे. कोरोनाची लाट ओसरल्यावर या अधिकाऱयांच्या भानगडी बाहेर पडू लागतील, तोपर्यंत वाट पहावी लागेल. कारण आपणही कोरोना योद्धे आहोत, असा आव आणून चेहऱयावर एन-95 चा मास्क चिकटवून वावरणाऱयांची संख्या काही कमी नाही. तुटपुंज्या संरक्षक सुविधा असताना कोरोना बाधितांवर थेट उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी, कोरोना वॉर्डबाहेर पहारा देणारा सुरक्षारक्षक, पोलीस यांना ज्या सुविधा मिळत नाहीत, त्या या अधिकाऱयांनी मिळविल्या आहेत. जे थेट कोरोनाबाधितांवर उपचार करतात त्यांना एन-95 चा मास्क, पीपीई किट आदी संरक्षक साधनांची अत्यंत गरज असते. त्यामुळे त्यांना या सुविधा प्राधान्यक्रमाने मिळाव्यात, अशी स्पष्ट सूचना केंद्र सरकारने दिली आहे. तरीही आपापल्या वातानुकूलित कार्यालयात बसून कोरोना नियंत्रणाच्या बैठका घेणाऱया अधिकाऱयांच्या नाकावर एन-95 चा मास्क एखाद्या आभूषणासारखा शोभतो आहे.
महामार्गावर उभारण्यात आलेल्या तपास नाक्मयावर प्रत्येक वाहन अडवून तपासणी करणाऱया पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. कोगनोळी तपास नाक्मयावर प्रत्येक जिल्हय़ातील नऊ पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. त्यापैकी हासन जिल्हय़ातून आलेल्या पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. या प्रकारानंतरही उर्वरित पोलिसांची स्वॅब तपासणी करण्याची तसदीही बेळगाव जिल्हा प्रशासनाने घेतली नाही. त्यांच्यात लक्षणे दिसून आली तर नंतर पाहू, या बेदरकार पवित्र्यात वावरणाऱया अधिकाऱयांमुळे पोलिसांना कोरोनाच्या छायेत काम करावे लागत आहे. खरेतर अशा परिस्थितीत त्यांचा उत्साह वाढवून आणि सुविधा पुरवून त्यांच्याकडून काम करवून घेण्याची गरज असते. कोरोना संशयितांवर व नियंत्रणासाठी लागणाऱया यंत्रणेवर खर्च करून आता सरकारही थकले आहे, असे दिसते. कारण डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी आदींना दिलेल्या सुविधा हळूहळू काढून घेतल्या जात आहेत. अनेक ठिकाणी कोरोना योद्धे म्हणून वरि÷ अधिकाऱयांवर पुष्पवृष्टी केली जात आहे. खरेतर खऱया अर्थाने डॉक्टर, परिचारिका, अंगणवाडी-आशा कार्यकर्त्या, पोलीस, महसूल खात्यात काम करणारे तलाठी, पीडीओ हे योद्धे आहेत. यापैकी अनेकांना काम करता करता कोरोनाची लागण झाली आहे. आजवर कुठल्याही वरि÷ अधिकाऱयाला लागण झाल्याचे समोर आलेले नाही. एकीकडे सरकारी यंत्रणेचा भोंगळपणा तर दुसरीकडे कोरोनाबद्दलही समाजात बळावलेल्या अंधश्रद्धा यामुळे फैलाव वाढतो आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढते आहे.
बेंगळूर ग्रामीण जिल्हय़ातील एक ताजे उदाहरण लक्षात घेता कोरोनाबाधितांवर वैद्यकीय उपचार नव्हे तर मांत्रिकाच्या मंत्र-तंत्रामुळे कोरोना बरा होतो, असा समज झालेला दिसतो. बेंगळूर ग्रामीण जिल्हय़ातील शिवगंगे या गावातील एका 55 वर्षीय महिलेला श्वसनाचा त्रास सुरू झाला. तिच्या कुटुंबीयांनी सुरुवातीला एका मंदिरात नेऊन तिच्यावर धार्मिक उपचार केले. त्याने त्रास थांबला नाही म्हणून त्यांनी तिला शेजारच्या गावातील मांत्रिकाकडे नेले. त्या मांत्रिकाच्या उपचारांनीही तिला उतार पडला नाही. 16 मे रोजी अखेर तिला इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे तिच्यामध्ये कोरोनाची लक्षणे असल्यामुळे डॉक्टरांनी तिचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले. यावेळी तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आणि गेल्या रविवारी 24 मे रोजी तिचा मृत्यू झाला. तिच्यावर उपचार करणाऱया मांत्रिकासह 28 जणांना आता क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. दोन-अडीच महिन्यात कोरोनाने खूप काही शिकविले आहे आणि यापुढेही तो शिकवतच राहणार आहे.