कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे मत
कणकवली:
‘कोरोना व्हायरस’चा जिल्हय़ात वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक अमंलबजावणी करण्याची गरज आहे. कोरोना संक्रमणाची ही साखळी तोडण्यासाठी काही महिन्यांपूर्वी वापरलेल्या ‘लॉकडाऊन’च्या पर्यायाचा पुन्हा विचार करण्याची गरज आहे, असे मत कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी व्यक्त केले आहे.
नलावडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, ‘कोरोना’च्या विरोधात लढा देत असताना जिल्हय़ात वाढत असणारा ‘कोरोना’चा आलेख खाली येण्याचे नाव घेत नाही. कणकवली तालुक्मयातही रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे समूहसंसर्ग वाढीस लागण्याची भीती आहे. पण, समूह संसर्ग वाढीस लागू नये, म्हणून जिल्हा प्रशासनामार्फत तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. गणेशोत्सवासाठी जिल्हय़ात आलेले चाकरमानी व स्थानिक नागरिक यांच्यातही कोरोनाचा संसर्ग झपाटय़ाने पसरत आहे. या साऱयाचा गांभीर्याने विचार करत जिल्हय़ात पसरणारी रुग्णसंख्या आटोक्मयात आणण्यासाठी तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे.
‘कोरोना व्हायरस’ची साखळी तोडण्यासाठी यापूर्वी जिल्हय़ात ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आले होते. त्याच धर्तीवर पुन्हा एकदा ‘लॉकडाऊन’चा पर्याय वापरून जिल्हय़ात पसरणारा समूह संसर्ग वेळीच रोखण्याच्या अनुषंगाने उपाययोजनांची गरज आहे, असेही नलावडे यांनी म्हटले आहे.