प्रशासनाने लक्ष देण्याची गरज, वैद्यकीय तपासणी सक्तीची करावी
वार्ताहर / देवरुख
पुणे, कोल्हापूर, सांगली जिल्हय़ातून अत्यावश्यक सेवा पुरवण्याच्या नावाखाली दररोज रत्नागिरी जिल्हयात शेकडो वाहने येत आहेत. सांगली, पुणे, कोल्हापूर या जिल्हयात कोरोना संक्रमित रुग्ण मोठया प्रमाणात आहेत. असे असताना रत्नागिरी जिल्हयात येणाऱया वाहनांवरील चालकांची आणि रत्नागिरी जिल्हयात येणाऱया वाहनांवरील चालक, क्लिनरची नियमित वैद्यकीय तपासणी झाली आहे की नाही याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे.
संगमेश्वर तालुक्यात टाळेबंदी अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचा प्रयत्न होत असताना घाट माथ्थावरुन येणाऱया कादे बटाटयाची विक्री करणाऱया वाहनांमुळे ताळेबंदीचा फज्जा उडताना दिसत आहे. महसूल आणि पोलीस प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे. रत्नागिरी जिल्हयात येणाऱया वाहनांची तपासणी करण्यासाठी कुंभार्ली घाट, आंबा घाट तसेच ठिकठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. या नाक्यावर परजिल्हयातून येणाऱया वाहनांची तपासणी होणे अत्यावश्यक आहे.
घाटमाथ्थावरुन येणाऱया वाहनांची संख्या शंभरहून अधिक आहे. खेड, चिपळूण, संगमेश्वर तालुक्यातील अनेक गावात या मालाची विक्री केली जाते. खरेदी करताना ग्राहकांची मोठी गर्दी होत असते. संगमेश्वर तालुक्यता काही गाडया कळकदरा मार्गे खडीओझरे, खडीकोळवण, बामणोली मार्गे देवरुख येथे येत आहेत. तसेच काही गाडया साखरपा मार्गे येत असल्याचे बोलले जात आहे. त्या वाहनांवरील चालक क्लिनरची वैद्यकीय तपासणी केलेली आहे की नाही. वैद्यकीय तपासणी केल्याचे त्यांच्याकडे पुरावे आहेत की नाही याची सखोल चौकशी होणेही गरजेचे आहे. घाटमाथ्थावरील कोरोना संक्रमित भागातून ही वाहने येत असल्यामुळे नागरिकांनीही सतर्क रहाण्याची गरज आहे.