भाषिक तणावाच्या पार्श्वभूमीवर निपाणी आगाराचा निर्णय
प्रतिनिधी / निपाणी
भाषिक तणावाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर-निपाणी बससेवा बंद करण्याचा निर्णय निपाणी आगाराने घेतला आहे. बससेवा बंद असल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली असून बससेवा कधी सुरू होणार हे अनिश्चित आहे. बंदमुळे कोल्हापूरसह इचलकरंजी, गडहिंग्लज, सातारा, सांगली आदी ठिकाणी जाणार्या बसही निपाणी आगारात थांबून आहेत. गाडय़ा थांबल्याने प्रवाशी- वाहकात वादावादीचे प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे.