”माझे कुटूंब,माझी जबाबदारी” योजनेअंतर्गत घर टू घर तपासणी पूर्णतेच्या टप्यात, नागरिकांना दिलासा
वारणानगर / दिलीप पाटील
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने सुरु केलेल्या ” माझे कुटूंब माझी जबाबदारी या योजनेत पन्हाळा तालुक्यात २ लाख ६३ हजार नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून घर ते घर तपासणी अंतिम टप्यात आली आसून या मोहिमेमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पन्हाळा विभागाचे प्रांताधिकारी अमित माळी, तहसिलदार रमेश शेंडगे, पंचायत समितीच्या सभापती तेजस्विनी शिंदे, गट विकास अधिकारी तुळशीदास शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी कवठेकर, यांच्या नियोजनाखाली सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी,आरोग्य सेविका, आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका,मदतनीस यांच्या मार्फत ग्रामपंचायतीच्या सहकार्याने तालुक्यातील सर्व नागरिकांचे शरीरात प्राणवायूचे तसेच तपमानाचे प्रमाण तपासण्यात आले.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्राथमिक स्तरावर केलेला या तपासणीने सर्वच नागरिकांना धीर मिळाला.
माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेचे काम प्रभावी होणेसाठी पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव, कळे, बोरपाडळे, केखले,पडळ, कोतोली या सहा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून १o५ तर नगर पालिका क्षेत्रात ५ अशी ११० आरोग्य तपासणी पथके निर्माण करून त्याद्वारे घर ते घर जाऊन माहिला व पुरुष नागरिक तसेच मुलाच्या तपासणी करण्यात आल्या तालुक्यात ५३ हजार ८५६ व पन्हाळा शहरातील ७८६ कुटूंबातील नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे.
आरोग्य तपासणीत सर्व लक्षणे असलेले रुग्ण ५५, आय एलआय लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या ३४२, कोमार्बिड अजार असलेल्या रूम्णांची संख्या १४ हजार ६२८, संदर्भीत सेवेसाठी दाखल केलेल्या रुग्णाची संख्या १८० यामध्ये स्वॅब तपासणी केलेले ११८ रुग्ण असून कोरोना पॉझीटीव्ह १० व्यक्ती आल्या होत्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.