प्रतिनिधी/शाहुवाडी
मलकापूर ता. शाहूवाडी येथील 60 वर्षीय व्यक्तीला श्वसनाचा गंभीर त्रास सुरू होता. या अवस्थेत त्यांना कोल्हापूर येथे दाखल करण्यासाठी नेण्यात आले. मात्र कुठेही बेड न मिळाल्याने अखेर त्यांना आपला जीव गमावण्याची वेळ आल्याने खरंच यापुढे गंभीर रुग्णांना जीवदान मिळेल का असा प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे. हताशपणे हॉस्पिटलला विनंती करणाऱ्या कुटुंबीयांना अखेर आपल्या नातलगाला गमावण्याची वेळ आली.
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा मोठा फैलाव आहे. रुग्णांची वाढती संख्या आरोग्य यंत्रणेला एक आव्हानच ठरत आहे. सर्वच हॉस्पिटल मध्ये मोठया प्रमाणात कोरोना रुग्ण असल्याने अनेकांना उपचारासाठी बेड कमी पडत आहेत. यात गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना आपल्या जीव गमावण्याची वेळ येऊ लागली आहे.
मलकापूर येथील एक साठ वर्षीय पुरुष यांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्यांचा कोरोना रिपोर्ट ही निगेटिव्ह होता. पुढील उपचारासाठी त्यांना नातेवाईकांनी तातडीने कोल्हापूर येथे हलविण्यात आले मात्र शहरातील हॉस्पिटलच्या दारात जाऊन त्यांनी हताशपणे विनवणी करून ही बेड शिल्लक नसल्याचे कारण सांगत कुठेही दाखल करून घेण्यात आले नाही. यात या रुग्णाला आपला प्राण गमवावा लागला. या घटनेने मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या मनात मात्र प्रश्न निर्माण झाला की खरंच या कोरोनाच्या नावाखाली गंभीर आजाराने त्रस्त रुग्णांना जीवदान मिळेल का असा सवाल उपस्थित होत आहे.