खानापूर / प्रतिनिधी :
खानापूर शहरासह तालुक्मयात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता 50 हून अधिक जण कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण आणण्यासाठी आता खानापूर शहर पूर्णवेळ लॉकडाऊन करणे गरजेचे आहे. त्यासाठी तालुका प्रशासनाने शहरात शंभर टक्के लॉकडाऊन करावा, या मागणीचे निवेदन भीम सेनेतर्फे गुरुवारी तहसीलदारांना देण्यात आले.
जून महिन्याच्या सुरुवातीपासून लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता केली. सकाळपासून दुपारपर्यंत किराणा दुकान व इतर काही दुकाने सुरू झाली. त्यामुळे जीवनावश्यक खरेदीसाठी खानापूर शहरासह तालुक्मयातील लोक बाजारात गर्दी करू लागले. त्याचाच परिणाम म्हणून तालुक्मयात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास शेकडो रुग्ण वाढण्याची शक्मयता आहे. त्यामुळे खानापूर शहरासह तालुका पुन्हा एकदा लॉकडाऊन करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ज्या ठिकाणचा रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे. त्या ठिकाणचे सीलडाऊन देखील हटवावे, अशीही मागणी त्या निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदन देण्यासाठी भीम सेनेचे तालुकाध्यक्ष मल्लेशी पोळ तसेच सेनेचे रोहित पोळ, नामदेव मादार, रफीक खान, श्रीनिवास भिरसे, शिवराज रजपूत, मुन्नाभाई तिगडी, सलीम बिडकर, आकाश अथनीकर, जुवेर फर्नांडिस आधीसह अनेक कार्यकर्ते व शहरातील नागरिक उपस्थित होते.
तहसीलदार रेशमा तलिकोटी यांनी निवेदन स्वीकारुन याबाबत वरिष्ठांना निवेदन पाठवून व त्यांच्याकडून जो आदेश येईल त्याची अंमलबजावणी करु, शिवाय सीलडाऊन झालेल्या भागाला 14 दिवस पूर्ण झाल्याशिवाय ते सीलडाऊन उठवता येत नाही. याबद्दल कुणीही गैरसमज निर्माण करु नये, अशीही विनंती त्यांनी यावेळी केली.