खानापूर : तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नाबरोबरच अधिकाऱयांची साथ आणि जनतेच्या पाठपुराव्याची गरज असते. प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडल्यास सुविधांपासून वंचित आणि मागासलेल्या समाजबांधवांना मुख्य प्रवाहात आणता येऊ शकते, असे प्रतिपादन आमदार अंजली निंबाळकर यांनी केले. येथील समाज कल्याण खात्याच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन करून त्या बोलत होत्या. प्रास्ताविक तालुका समाज कल्याण अधिकारी हणमंत वक्कुंद यांनी केले. यावेळी जि. पं. चे सहाय्यक अभियंते अजितकुमार हालसुंडे म्हणाले, अनुसूचित जाती-जमातीच्या वसाहतीतील बहुतांश रस्त्यांचा विकास करण्यात आला आहे. आणखी प्रलंबित कामे असल्यास 28 फेब्रुवारीपूर्वी प्रस्ताव द्यावा, अशी त्यांनी विनंती केली. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला ता. पं. सभापती नंदा कोडचवाडकर, जि. पं. सदस्य सुरेश मॅगेरी, जितेंद्र मादार, नगराध्यक्ष मजहर खानापुरी, नगरसेवक लक्ष्मण मादार, हणमंत पुजारी, तोईद चांदकन्नवर, ता. पं. सदस्य बसवराज सानिकोप, श्रीकांत इटगी, शिवानंद चलवादी, एन. सी. तळवार, सुभाष चलवादी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन हणमंत बिरादार तर गिरीश कुरहट्टी यांनी आभार मानले.
Previous Articleखानापूर-रामनगर मार्गावर अवजड वाहनांना बंदी
Next Article अतिवाड मराठी शाळेत स्वच्छतागृह बांधकामाचा शुभारंभ
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.