– विठुरायाचे दर्शन घेऊन ‘आप’च्या स्वराज्य यात्रेची सुरुवात
प्रतिनिधी / पंढरपूर
राज्यातील पन्नास खोक्यांचे सरकार तग धरून बसलेले आहे, ते लोकशाहीसाठी अत्यंत अपायकारक आहे. आज कांद्याला योग्य भाव मिळत नाही, कापूस विकला जात नाही. परंतु या सरकारला दयामाया उरली नसून हे सरकार निष्टुर झाले असल्याची टीका ‘आप’च्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या प्रीती शर्मा मेनन यांनी केली.
स्वराज्य यात्रेची सुऊवात पंढरपूर येथून श्री विठ्ठल-ऊक्मिणीचे दर्शन घेऊन करण्यात आली. यावेळी प्रीती मेनन यांनी माध्यम प्रा]ितनधींशी संवाद साधला. पंढरपूर येथे विठुरायाचे दर्शन घेऊन महाराष्ट्रातील आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून स्वराज्य यात्रेची सुरुवात करण्यात आली.
यावेळी पुढे बोलताना मेनन म्हणाल्या, की आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय नेत्यांच्या तसेच प्रभारी दीपक सिंघला तसेच सह-प्रभारी गोपाल इटालिया यांच्या निर्णयानुसार आम्ही संपूर्ण महाराष्ट्राभर स्वराज्य यात्रा काढणार आहोत. स्वराज्य यात्रेची सुरुवात पंढरपूर येथून झाली असून ती रायगडपर्यंत सुरू राहणार आहे. खोके सरकार खूप मोठमोठ्या घोषणा करतात पण जमिनीवर काम काही होत नाही. आज कांद्याला योग्य भाव मिळत नाही, कापूस विकला जात नाही परंतु या सरकारला महाराष्ट्रातल्या जनतेची काहीच दयामाया नाही. आज आम्ही विठ्ठलाचरणी हीच प्रार्थना करायला आलो आहोत की, या सरकारला सुबुद्धी मिळो आणि महाराष्ट्रातील जनतेलाही बळ मिळो जेणेकरून या जुलमी सरकारला सत्तेबाहेर जनता काढतील आणि एका खऱ्या अर्थाने आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य इथे स्थापन होईल.
आम आदमी पार्टी महाराष्ट्रातील आगामी सर्व स्थानिक निवडणुका, तसेच लोकसभा आणि विधानसभा निडणुकाही लढणार आहे. भाजपचा दुटप्पीपणा समोर आणत त्या म्हणाल्या की भाजप सत्तेसाठी काहीही करू शकते. त्यामुळे लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी सगळ्यांनी भाजप विऊद्ध एकवटले पाहिजे.
लोकांना जोडण्याचा यात्रेमागचा मूळ उद्देश
स्वराज्य यात्रेमागचा मूळ उद्देश हा लोकांना जोडण्याचा आहे आणि लोकांना पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांची उजळणी करून देणे, हा आहे. कारण जनता आज या पन्नास खोक्यांच्या सरकारपुढे हताश झालेली आहे. जनतेला त्यांचे स्वातंत्र्य परत मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या मताचे मोल काय आहे याची त्यांना जाणीव करून देण्यासाठी आम्ही ही यात्रा काढत आहोत. आमचे महाराष्ट्राचे सर्व नेते, सह-प्रभारी गोपाळ इटालिया यांच्या मार्गदर्शनाखाली इथून रायगडपर्यंत जाऊन लोकांना जागृत करणार आहोत, असे मत प्रीती शर्मा मेनन यांनी व्यक्त केले.