प्रतिनिधी /बेळगाव
गणपत गल्ली-खडेबाजार कॉर्नर येथे गळतीमुळे दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. हे पाणी साचून रहात असल्यामुळे ये-जा करणाऱया दुचाकी व चारचाकी वाहनांमुळे पाणी नागरिकांवर व आजुबाजूच्या विपेत्यांवर उडत आहे. त्यामुळे ही पाण्याची गळती थांबवावी, अशी मागणी परिसरातील व्यापाऱयांनी केली आहे.
खडेबाजार कॉर्नर येथे दररोज मोठय़ा प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. या परिसरात अनेक लहान मोठे व्यापारी व्यवसाय करीत आहेत. परंतु सततच्या पाणी गळतीमुळे परिसरातील व्यापाऱयांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागत आहे. पाणी उडाल्याने विक्रीसाठी ठेवण्यात आलेले कपडे व इतर साहित्य खराब होत आहे. तसेच ये-जा करणाऱया नागरिकांनाही याचा फटका बसत आहे.