गूड न्यूज : कोरोना काळात कमी होणाऱया अँटीबॉडीमुळे घाबरु नका, तज्ञांचा सल्ला
कोरोना संसर्गातून बरे झाल्यावर शरीर त्याच्या विरोधात अँटीबॉडीजची निर्मिती करते. परंतु ही अँटीबॉडी किती काळापर्यंत प्रभावी राहते हा प्रश्न उपस्थित होतो. अँटीबॉडीज काही काळानंतर कमी होऊ लागतात असे प्रारंभिक संशोधनातून समोर आले होते. परंतु कमी होणाऱया अँटीबॉडीमुळे घाबरण्याची गरज नाही, अँटीबॉडी शरीराला त्यांची तत्काळ गरज नसल्यानेच कमी होतात. इम्युनिटी पेशी विषाणूची स्मृती ठेवतात, याचमुळे गरजेवेळी पुन्हा अँटीबॉडी तयार करू शकतात, असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
प्रारंभी काही जणांमध्ये अँटीबॉडीज घटल्यावरही त्यांची पातळी किमान 4 ते 7 महिन्यांपर्यंत कायम राहते. केवळ अँटीबॉडीजच आमच्या रोगप्रतिकारक शक्तीचे हिस्सा नाहीत. अँटीबॉडीज इम्यून सिस्टीमचा केवळ एक हिस्सा आहेत, ज्यांची गणना करता येते. उर्वरित इम्यून सिस्टीमचे 3 हिस्सेही आजाराला दूर ठेवण्यास मदत करत असल्याची माहिती लंडनच्या इम्पीरियल कॉलेजलमधील महामारी तज्ञ डॉ. पॉल इलियॉट यांनी दिली आहे.
कुठलाही जिवाणू किंवा विषाणू शरीरात शिरल्यावर इम्युन सिस्टीमच अँटीबॉडीची निर्मिती करते. इम्यून सिस्टीमच अशा घुसखोरांची ओळख पटवते. संक्रमण संपुष्टात आल्यावर अँटीबॉडीची पातळीही कमी होते.
ब्रिटनमध्ये साडेतीन लाख लोकांवर तीन टप्प्यातील अँटीबॉडी चाचण करण्यात आली, ही चाचणी 20 जून ते 28 सप्टेंबरदरम्यान करण्यात आली. तीन महिन्यांदरम्यान ओळख पटविण्यायोग्य (डिटेक्टेबल) अँटीबॉडीजची पातळी या लोकांमध्ये 6 ते 4.8 टक्क्यांपर्यंत राहिली आहे.
संक्रमणमुक्त झाल्यावर शरीरात अँटीबॉडीज कमी होणे अत्यंत सामान्य बाब आहे. परंतु इम्युनिटी सेल्स विषाणूच्या स्मृती कायम ठेवतात आणि गरज भासल्यास नव्याने अँटीबॉडी तयार करू शकतात, असे अनेक तज्ञांचे मानणे आहे.
पूर्णपणे संक्रमण झाल्यावर शरीरात अँटीबॉडी कमी होण्याचा अर्थ व्यक्तीची रोगप्रतिकारक क्षमता योग्यप्रकारे काम करत आहे. दीर्घकाळापर्यंत अँटीबॉडी नसल्याचा अर्थ दीर्घकाळापर्यंत त्याची इम्यून सिस्टीम कमजोर झाली असा होत नसल्याचे युनिवर्सिटी ऑफ पेन्सिलवेनियाच्या इम्यूनोलॉजिस्ट डॉ. स्कॉट हेन्स्ले यांनी सांगितले आहे.
अँटीबॉडी म्हणजे काय?
अँटीबॉडी या प्रोटीनने तयार झालेल्या विशेष प्रकारच इम्यून पेशी असतात, ज्यांना लिम्फोसाइट म्हटले जाते. शरीरात एखादी बाहेरील गोष्ट (फॉरेन बॉडीज) पोहोचल्यास त्या सतर्क होतात. जिवाणू किंवा विषाणूच्या विषारी पदार्थाला निष्क्रीय करण्याचे काम याच अँटीबॉडीज करतात. अशाप्रकारे त्या शरीराला प्रतिरक्षण देऊन सर्वप्रकारच्या रोगाणूंचा प्रभाव निष्प्रभ करतात.