आमदार सतीश जारकीहोळी यांचे आवाहन : तालुका पंचायतमध्ये यमकनमर्डी कार्यक्षेत्रातील अधिकाऱयांची बैठक
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोना महामारीमुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे तर विकासही खुंटला आहे. अशा परिस्थितीत आता अनलॉक सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून गावातील कोणत्याच कामांना गती मिळाली नव्हती. आता यापुढे कामाला लागा आणि गावागावात विकासाला प्राधान्य द्या, असे आवाहन आमदार सतीश जारकीहोळी यांनी केले आहे.
तालुका पंचायतमध्ये यमकनमर्डी कार्यक्षेत्रात येणाऱया अधिकारी, पीडीओ आदी अधिकाऱयांची बैठक घेऊन त्यांनी हे आवाहन केले. सध्या पावसाने बऱयापैकी साथ दिली आहे. मात्र, अजूनही काही भागांत पाणी समस्या आहे. वीजपुरवठा तसेच अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी अधिकाऱयांना केले.
यमकनमर्डी कार्यक्षेत्रात विविध समस्यांनी तेंड वर काढले आहे. याकडे अधिकारीवर्गाचे साफ दुर्लक्ष झाले आहे. विशेष करून पीडीओंनी गावच्या विकासासाठी मोलाचे सहकार्य करण्यासाठी धडपड करावी. विकास योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करण्यात येत नाहीत. त्यामुळे कार्यक्षेत्रात विविध समस्या निर्माण होत आहेत. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सर्व समस्या सोडविण्याचे आवाहन त्यांनी केले.
बेळगाव तालुक्मयात अतिवृष्टीमुळे अनेकांची घरे पडली आहेत. सरकारकडून काही अनुदान मिळाले आहे. अजूनही बरेच जण अनुदान न मिळाल्याने समस्येत आहेत. सरकारने पहिल्या श्रेणीतील घरे पडलेल्यांना 5 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले. त्यामधील काहींना 3 तर काहींना 4 लाख देण्यात आले आहेत. तातडीने उर्वरित अनुदानही द्यावे, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य चेतन कांबळे यांनी केली. यावेळी सतीश जारकीहोळी यांनी याबाबत अधिकाऱयांना याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही समस्या तातडीने सोडवा, असे सुनावले.
व्यासपीठावर जि. पं. उपाध्यक्ष अरुण कटांबले, सदस्य सिद्धू सुणगार, ता. पं. उपाध्यक्ष मारुती सनदी, प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णावर उपस्थित होते. तालुका पंचायत सदस्य यल्लाप्पा कोळेकर, केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, भीमा नाईक, पीडीओ अश्विनी कुंदर, एम. जी. बरगी, श्रीधर सरदार, गटशिक्षणाधिकारी जुट्टण्णावर आदी अधिकारी उपस्थित होते.