नवी दिल्ली
जयपूर येथील स्मॉल फायनान्स बँकेने काही गुंतवणूकदारांना समभाग सादर केले होते. त्याच्या मदतीने बँकेने जवळपास 625.50 कोटी रुपयाचा निधी जमा केला आहे. ही गुंतवणूक पात्र अशा संस्थात्मक नियोजनाच्या आधारे प्राप्त करण्यात आल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली आहे.
बँकेने क्य़ूआयपीच्या मदतीने 50 लाख इक्विटी समभागातून जवळपास 625.5 कोटी रुपयाचा निधी प्राप्त करण्यास यशस्वी झाला आहे. सदरचा इश्यू 9 मार्च रोजी सादर करण्यात आला होता. यामधून कमीत कमी मूल्य 1,181.06 रुपयाचे प्रति समभाग ठेवलेला होता. देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थात्मक गुंतवणूकदार दोन्ही बाजूनी चांगली कामगिरी करत राहिल्याने हे यश बँकेने मिळवले असल्याचे सांगितले आहे. यामध्ये विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूक, जीवन विमा कंपन्या आणि देशातील म्युच्युअल फंड याच्या माध्यमातून गुंतवणूक प्राप्त करण्यात आली आहे.