ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यातील महिलांवर होणाऱया अत्याचारांच्या घटनाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेत गुन्हेगारांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी गृह विभागाला दिले आहेत.
महिला व बालकांची सुरक्षा हा शासनाच्या सर्वोच्च प्राधन्याचा विषय असून यात हयगय करणाऱयांना माफी नाही असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, पोलीस यंत्रणेतील कोणतीही व्यक्ती, मग ती अधिकारी असेल किंवा कर्मचारी जे या कामात टाळाटाळ करतील किंवा विलंब लावतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
तसेच महिलांना मोकळेपणाने आपल्यावरील अत्याचाराची माहिती पोलिस ठाण्यात येऊन नोंदवता यावी याठी प्रत्येक जिह्यात महिला पोलिस ठाणे सुरू करण्यासंबंधी गृहविभागाने चाचपणी करावी असेही आज मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
महिला अत्याचारांच्या घटनेत न्यायालयात प्रकरणे दाखल झाल्यानंतर त्याचा निकाल लागण्यास खुप विलंब लागतो. यामुळे गुन्हेगारांवर वेळीच कारवाई होऊन त्यांच्यावर जरब बसावा यासाठी महिला अत्याचाराच्या केसेस लवकरात लवकर निकाली लागतील यासाठी राज्य शासन फास्ट ट्रक कोर्ट, विशेष न्यायालयांची स्थापना यासारख्या गोष्टीं प्राधन्याने हाती घेणार आहे.