एखादा मनोविश्लेषक म्हणजेच सायको अनालिस्ट काय सांगेल, असे भागवतकार व्यासजी आपल्या मनाचे विश्लेषण करताना सांगतात, ‘प्रथम काया, वाचा, मने प्रभूला सर्वस्व अर्पण करा. सर्व अवयवांनी केलेली प्रत्येक कृती भगवंताला अर्पण करा. आपला सर्व भार त्याच्यावर टाका आणि निश्चिन्त मनाने गुरुसेवा करा, म्हणजे गुरुंवर आणि त्यांच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवा आणि मनात येणारा प्रत्येक वाईट विचार देवाला अर्पण करा, म्हणजे पहा काय चमत्कार होतो! तुम्ही अंतर्बाह्य निर्भय व्हाल. आता अंतर्बाह्य चित्तशुद्धी होणे हे आपले ध्येय ठेवूया आणि त्यासाठी काय आणि कसे करायचे ते पुढे पाहू….अंतर्बाह्य चित्तशुद्धी हे आपले पहिले ध्येय असावे. भोळे भाबडे लोक यात फार पुढे असतात. धर्मग्रंथात सांगितलेले त्यांना लगेच पटते.
पण जो शिकला सवरलेला असतो त्याला शंका फार आणि श्रद्धा कमी अशी परिस्थिती असते. लहान मुलांचे चित्त अगदी शुद्ध असते. कारण त्यांच्या मनावर स्वार्थाची पुटं चढलेली नसतात. म्हणून श्रीमहाराज म्हणायचे की, ‘भगवंताकडे जाताना लहान मूल होऊन जावे!’
चित्तशुद्धीसाठी नाथमहाराज सांगतात की, ‘हरिचे अवतार, गुण व कर्मे मोठय़ा आवडीने, आदराने ऐकावीत. चुकलेले मूल परत आले की माता तो कुठे गेला होता, त्याने काय खाल्ले, काय पिले हे जेवढय़ा आवडीने ऐकते तेवढय़ाच आवडीने हरिकथा ऐकावी. कारण हरि हा सगळय़ात श्रे÷ आहे. भगवंतानी केलेली परमार्थ युक्त कर्मे ऐकून त्यांचे मनन करावे. आपण जे ऐकतो ते मनन केल्याने परमपावन होतो. ज्या गोष्टीचे मनन करावयाचे आहे ती मन लावून ऐकली जाते. असे मन एकाग्र करून ऐकलेले हरिचे नाव कानात शिरताच अंतःकरणात स्थिर होते व त्याने सारे पाप धुतले जाऊन तो हरिचरणी तल्लीन होतो.
हे सगळे हरिचरणी तुमची श्रद्धा असेल तरच शक्मय होते. कारण मनात शंका, संशय असे काही नसते म्हणून. पूर्ण श्रद्धेने अत्यंत आवडीने भगवंतांच्या रंगात रंगून जा. एवढे आवडीने करा. मग जप, तप, तीर्थयात्रा काहीही करण्याची गरज नाही. यमनियम नकोत, उपास नकोत, योगाभ्यास नको. कीर्तनाच्या गजराने हरि आनंदाने डोलू लागतो. हरिकीर्तन हा भक्तीचा राजमार्ग आहे आणि या मार्गात स्वतः चक्रपाणी रक्षण करत असतो. कसं? तर चक्राने अभिमानाचा चेंदामेंदा करतो, गदेने मोह ममतेला ठोकून काढतो, शंखाने आत्मबोध जागृत करतो आणि कमळाने सदैव आपल्या भक्ताची पूजा करतो.
ज्यांना कथाकीर्तनाचा लाभ घेता येत नसेल त्यांनी नामस्मरण करावे. त्यांची कधीही अधोगती होणार नाही. सतत नामस्मरण करून भक्त भगवंताच्या अंतरस्वरूपाशी एकरूप होतात. नाम घेतल्याने चारी मुक्ती साध्य होतात. यांच्यापेक्षा सुगम असे कोणतेही साधन नाही. कथा कीर्तनाचे, नामस्मरणाचे महत्त्व आपण बघितले. वारंवार त्याचे श्रवण, मनन आणि स्मरण केल्यावर आपली चित्तशुद्धी कशी होते ते पुढे पाहू…
भगवंताचे कीर्तन करून, ऐकून, नामस्मरण करून होणाऱया चित्तशुद्धीमुळे माणसाचा उद्धार होतो असे नाथमहाराजांनी सांगितले. आता भजनाने आणि नामाने चित्तशुद्धी कशी होते ते नाथमहाराज सांगत आहेत.
ते म्हणतात, ‘हरिकीर्तीचे श्रवण व हरिनामाचे स्मरण केले असता, अंतःकरणात सप्रेम भक्ती वाढत जाते. जागृतावस्थेत तर तो आवडीने गुण कीर्तन, स्मरण करत असतोच, पण हळूहळू ही स्थिती स्वप्नातसुद्धा राहते. असे झाले की, हरिभक्ती उत्तम प्रकारे हृदयात ठसली असे समजावे. ही स्थिती प्राप्त झाली की चित्तात हरिनाम कीर्तनाविषयी अद्भुत प्रेम निर्माण होते. या प्रेमामुळे हरीची त्याच्यावर संपूर्ण कृपा होऊन त्याच्या आतबाहेर हरि प्रकट होत असतो. सबाह्य अंतरी, तू एक दत्त! असे दत्ताच्या आरतीत आपण म्हणतो तीच ही अवस्था! हरीच्या या प्रकटण्याने जिवाशिवाची भेट होते आणि भक्ताच्या डोळय़ात आनंदाश्रू उभे राहतात. एखादी प्रिय व्यक्ती खूप दिवसांनी भेटली असेल तर आपणास आनंदाश्रू येत असतात. इथे तर जिवा शिवाची फार दिवसांनी, नव्हे फार जन्मानंतर गाठ पडते. मग तो आनंद वर्णनाच्या पलीकडलाच असणार! त्याची प्रत्यक्ष अनुभूती घ्यायला हवी. कारण जागेपणी आणि स्वप्नात आपण जे अनुभवतो ते सर्वांना शक्मय आहे. पण त्यानंतरच्या अवस्थेत म्हणजे समाधी अवस्थेतच हरिचे अस्तित्व आतबाहेर जाणवणे शक्मय असते. भक्त आता भगवंत स्वरूप झालेला असतो, त्यामुळे भगवंताप्रमाणेच तोही सर्वत्र व्यापून राहिला आहे. इतर सर्वजण त्याचाच भाग आहेत किंवा त्याचीच रूपे आहेत असे त्याला वाटू लागते. मग कुणाचा राग, द्वेष, तिरस्कार अथवा निंदा तो कशाला करेल? उदाहरणच द्यायचे झाले तर हाताचे देता येईल हाताची बोटे वेगवेगळी असतात पण ती हाताचाच भाग असतात. तसेच सर्व सजीव, निर्जीव त्याचाच भाग होतात. त्यामुळे प्रत्येक सजीव, निर्जीव वस्तूतील भगवंत त्याला स्पष्ट दिसू लागतो. तो अगदी शुद्धचित्त झालेला असतो. चित्तशुद्धीमुळे भक्त आता भगवंत स्वरूप होतो, त्यामुळे भगवंताप्रमाणेच तोही सर्वत्र व्यापून राहतो, इतर सर्वजण त्याचाच भाग आहेत किंवा त्याचीच रूपे आहेत असे त्याला वाटू लागते. हा सर्व हरिनामाचा महिमा आहे. विधिपूर्वक पूजाविधान किंवा श्रवण, स्मरण, कीर्तन करत असताना, ज्या भक्तांची सगळीकडे भगवंत भरून राहिला आहे अशी भावना होते त्यालाच पूर्वप्राप्ती साध्य होते. बाळ जसे आईजवळ धावत येते तसे, जो खरा भक्त असतो त्याच्याजवळ विरक्ती धावत येते. जेव्हा भक्ती व विरक्ती एकाचवेळी भक्तामध्ये राहतात, तेव्हा त्या सामर्थ्यावर भक्त मोठा बलवान होतो. जेथे भक्ती आणि विरक्ती एकत्र नांदू लागतात तेथे पूर्णप्राप्ती ही सदासर्वकाळ दासीसारखी राबते. भक्ती आणि विरक्तीच्या एकोप्यामुळे भक्तांच्या घरी अनुभवप्राप्तीही नांदू लागते. आता भक्ती, विरक्ती आणि अनुभवप्राप्ती या तिन्ही एकाचवेळी कशा उत्पन्न होतात ते पाहू. ज्या प्रमाणे सुग्रास जेवणाऱयाला पुष्टी, तुष्टी आणि क्षुधानाश ही एकदम प्राप्त होतात त्याप्रमाणे शुद्ध अंतःकरणाने भगवतभक्ती करणाऱयाला भक्ती, विरक्ती आणि अनुभवप्राप्ती एकदमच मिळतात. भक्ती म्हणजे प्राणिमात्रांच्या ठायी प्रेमभावना, मी आणि माझे अशी भावना नष्ट होणे म्हणजे विरक्ती आणि अनुभवप्राप्ती म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराची भेट. यासाठी ज्याला स्वतःच्या हिताची लालसा असेल त्याने अतिशय आदराने हरिभक्ती करावी आणि श्रे÷ अशा परमपदाचा लाभ घ्यावा. असे पूर्णप्राप्ती झालेले भगवतभक्त जगामध्ये कसकसे वागतात ते पुढे पाहू. विधिपूर्वक पूजा करत असताना, कीर्तन करत असताना, ते ऐकत असताना किंवा नामस्मरण करत असताना जो तल्लीन होतो त्याला पूर्वप्राप्ती साध्य होते असे म्हणतात. अशी पूर्वप्राप्ती साध्य झाली की तेथे वैराग्य आपोआपच येते. वैराग्य म्हणजे अमुक एक आपल्याला हवे आहे किंवा नको असे दोन्हीही जेव्हा वाटत नाही अशी मनाची अवस्था. जेव्हा भक्ती आणि विरक्ती एकत्र येतात तेव्हा भक्ताला पूर्णप्राप्ती होते म्हणजेच भगवतप्राप्ती होते.
थोडक्मयात भगवत भजनात तल्लीन, विरागी झालेल्याना देव भेटतो. त्यासाठी हरिभक्ती हे उत्तम अंजन आहे. हे डोळय़ात घातल्यास भजनरुप महायोगाने भगवतस्वरूपाचा ठेवा भक्ताच्या हाताला लागतो, म्हणून भगवत भक्त धन्य होत. ते सर्व व्यवहार करत असतात पण विषयाविषयी विरक्त असतात. अशा प्रकारे पूर्णप्राप्ती करून घेतलेले भक्त कसे वागतात ते सांगताना नाथमहाराज म्हणतात, ‘आतापर्यंत कवी नावाचे अर्षभ माहिती देत होते. या वेळी हरि नाव असलेले अर्षभ उत्तर देत आहेत, त्यांच्या उत्तराप्रमाणे अशा भक्तांना सगळीकडे भगवंतच दिसत असतो. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन वागण्यामध्ये मान, अपमान, नफा, तोटा या वागण्यांना स्थान नसते. साहजिकच त्यांचे वागणे बोलणे चारचौघांसारखे असत नाही. त्यांना अवलिया म्हणणे योग्य ठरेल. याबाबतीत तुकाराम महाराजांचे वर्तन सर्वाना माहीत आहेच. हे भक्तांचे शुद्ध लक्षण होय. त्यांची विचारसरणी अशी असते की, सर्व प्राणिमात्रांमध्ये भगवंत आहे. त्याही पुढे जाऊन सर्व प्राणिमात्र भगवंताचाच अंश आहेत आणि हा जो भगवंत आहे, तो मीच आहे अशी त्यांची पक्की धारणा असते आणि यात कुठेही आत्मप्रौढी नसते कारण ही त्याच्या मनाची सहजावस्था होय. असा भक्त ज्याला सगळय़ांच्यातला भगवंत स्पष्ट दिसत असतो त्याला उत्तमोत्वाचा मान मिळून श्रे÷ अवतार मानतात. भगवंत त्याला अग्रगण्य योगी, ज्ञानशिरोमणी, सिद्धांचा मुकुटमणी अशी विशेषणे देऊन गौरवतात.
श्रीगोंदवलेकर महाराज म्हणायचे की मला तुम्ही सगळे रामरूप दिसता. यातील गूढ असे की, ते स्वतः भगवंतानी सांगितलेली वरील विशेषणे बाळगून होते.
अशांच्या मनामध्ये विषयसेवन करत असताना सुखदुःखाचे विचार येत नाहीत. मग ते विषयसेवन का करत असतात, हा प्रश्न येतो. तर त्याचे उत्तर असे की, प्रारब्ध कर्म अतिशय बलवान असते ते भक्तांकडून विषयसेवन करवते. पण त्यांना देहबुद्धी नसल्याने सुख दुःख होत नाही.
क्रमशः