प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ातील काँग्रेस पक्षाला नवचैतन्य देऊन संघटन बळकटी देण्याचे प्रदेश स्तरावरून पाऊल उचलण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हातील सर्व तालुके, सर्व जिल्हा परिषद मतदार संघ, पंचायत समिती मतदार संघातील सर्व स्त्राr, पुरूष, युवा कार्यकर्त्यांना संघटना कार्याच्या माध्यमातून सहभागी करून घेवून नेतृत्व देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्हा काँग्रेस संघटन बळकटीसाठी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी लक्ष वेधले आहे. रत्नागिरी जिल्हा काँग्रेसची संघटन मजबुतीसाठी सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी कोकणचे नेते कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश मुझफ्फर हुसेन, माजी खासदार हुसेन भाई दलवाई, आम भाई जगताप, जिल्हा निरीक्षक मनोज शिंदे, रत्नागिरी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ऍड. विजयराव भोसले, माजी आमदार हुस्नबानू खलिपे आणि जिल्हय़ातील पदाधिकारी, तालुकाध्यक्ष यांची संयुक्त बैठक गांधी भुवन मुंबई येथे घेतली .
बैठकीमध्ये जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय शासकीय कमिटय़ा तसेच एसईओ यांची रचना व नावांच्या यादीचे वाचन करण्यात आले. जिल्हय़ातील सर्व तालुके, सर्व जिल्हा परिषद मतदार संघ, पंचायत समिती मतदार संघातील सर्व स्त्राr, पुरूष, युवा कार्यकर्त्यांना सहभागी करून घेतले जाणार आहे. त्यावेळी नेतृत्व देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी आश्वासित केले. ऍड. विजयराव भोसले यांनी सर्व तालुकानिहाय याद्याचे वाचन झाले. नंतर गृह राज्यमंत्री सतेज पाटील व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष यांनी आणखी काही नावे राहिली असतील तर ती इतरांनी सूचवावीत. येत्या 19 डिसेंबरपर्यंत यादी अंतिम करावी, असे सूचवले.
बैठकीत आमदार भाई जगताप, माजी खासदार हुसेन दलवाई, मनोज शिंदे, यांनी मार्गदर्शन केले. या चर्चेत माजी आमदार हुस्नबानू खलिपे, अविनाश लाड, अशोकराव जाधव, लियाकत शहा, राजेंद्र भुरण, दत्ता परकार, विनय खामकर, दीपक निवाते, अशपाक काद्री, सुरेश कातकर, भारत खेडेकर, आब्बास आंबेडकर, राजेश पत्यानी, आसिफ काझी, गजानन पिलणकर, गौस खतीब, प्रसाद उपळेकर, कपील नागवेकर, बंटी गोताड, सचिन मालवणकर आदींनी चर्चत भाग घेतला.
आगामी निवडणुकांच्या मोर्चेबांधणीला लागा
या बैठकीत जिल्हय़ातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पक्षाने सक्रिय सहभाग घेवून संघटन मजबूत करावे, असे आवहन करण्यात आले आहे. तसेच आगामी होणाऱया नगर पंचायती, नगर परिषदा निवडणुकांची तयारी ही पक्ष कार्यकर्त्यांनी सक्रिय होऊन करावी, अशाही सूचना जिल्हा पदाधिकाऱयांना करण्यात आल्या.