ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज मंगळवारी एक पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, मागील 70 वर्षांत देशात जेवढी संपत्ती उभी करण्यात आली, ती संपत्ती मोदी सरकारने फक्त विकून टाकण्याचे काम केले आहे. रेल्वेचे खासगीकरण करण्यात येत आहे. पंतप्रधान सगळे विकून टाकत आहेत.
पुढे ते म्हणाले, नरेंद्र मोदी आणि भाजपचा नारा होता की 70 वर्षात काहीही झाले नाही’ आणि काल अर्थमंत्र्यांनी 70 वर्षात या देशाची राजधानी होती ती विकण्याचा निर्णय घेतला आहे.
ते म्हणाले की एकाधिकार निर्माण करण्यासाठी सर्व खाजगीकरण केले जात आहे. पॉवर, टेलिकॉम, वेअरहाऊसिंग, खाणकाम, विमानतळ, बंदरे हे सर्व एकाधिकार निर्माण करण्यासाठी केले जात आहे. बंदर कोणाच्या हातात आहेत, विमानतळ कोणाला मिळतात हे तुम्हाला माहिती आहे.
आम्ही दीर्घकाळ तोटय़ात चालणाऱया उद्योगांचे खासगीकरण केले आहे. आम्ही अशा कंपन्यांचे खाजगीकरण केले ज्यांचा बाजारात किमान वाटा तरी आहे. आम्ही खासगीकरणाच्या विरोधात नाही आहोत. मात्र, आमच्या खासगीकरणाला लॉजिक होते. आम्ही धोरणात्मक उद्योगांचे खाजगीकरण केले नाही. असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.