क्वारंटाईन झाल्याने मतदानाला मुकणार
प्रतिनिधी/कोल्हापूर
गोकुळच्या निवडणुकीवर कोरोनाचे सावट दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे. शाहूवाडी आणि शिरोळ तालुक्यातील ठरावधारकांचा कोरोनाने बळी घेतला तर हातकणंगले, आजरा तालुक्यातील आणखी चार ठरावधारकांनी चिंता वाढवली आहे. यातच जिल्हÎातील 40 ठरावधाकरकांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याचे समजते. ते सर्व ठरावधाकर क्वारंटाइ असल्याची माहिती सोमवारी दुपारी समोर आली. त्यामुळे त्यांना क्वारंटाईनचा 14 दिवसांचा कार्यकाल पूर्ण करावा लागणार असल्याने मतदानाला मुकावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान पॉझिटीव्ह अहवालाचा असाच वेग वाढत राहिल्यास निवडणुकीवरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गोकुळ निवडणूक सुरवातीपासूनच कोरोनाच्या सावटाखाली सुरु आहे. कोरोनाच्या कारणाने राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबवणीवर टाकल्या. मात्र न्यायालयाच्या आदेशाचे कारण पुढे करीत गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरुच राहिली असे सष्ट आदेश सहकार निवडणूक प्राधिकरणाने दिल्याने प्रक्रिया सुरु करण्यात आली. या विरोधात काही संस्थांनी उच्च आणि आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. या याचिकवरील निर्णय प्रलंबित आहे. दरम्यान सत्ताधारी व विरोधी आघाडीकडून निवडणूक प्रचाराचा धडाका सुरु आहे. जाहीर मेळावे, ठरावधारकांच्या गाठीभेटी सुरु आहेत. प्रमुख नेते मंडळी आणि उमेदवारांनी तालुका तालुक्यात तळ ठोकला आहे. एकाबाजुला प्रचार यंत्रणेने पायाला भिंगरी बांधली असताना ठरावधाक किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह येत आहेत. त्यामुळे ठरावधाकरक भीतीच्या छायेखाली आहेत. आतापर्यंत 40 ठरावधारक बाधित झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे दोन्ही आघाडीच्या नेत्यांकडून प्रचार दरम्यान खबरदारी घेण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्या आहेत.
निवडणूक अंतिम टप्प्यात आल्याने दोन्ही आघाडÎांकडून ठरावधारकांना सहलीवर पाठवण्याचे नियोजन केले असून कोरोना चाचणी करुन ठरावधारकांना सहलीवर पाठवले जात आहे. जिल्हा बंदी असल्याने जिल्हÎातीलच थंड हवेच्या ठिकाणी सहलीचे नियोजन केले आहे. सत्ताधारी गटाने हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील ठरावधारक सोमवारी सहलीवर पाठवले. शाहूवाडी, पन्हाळ येथील अज्ञातस्थळी त्यांना ठेवण्यात आले आहे. तर करवीर तालुक्यातील ठरावधारक मंगळवारी रवाना होणार आहेत. तत्पूर्वी धोका टाळण्यासाठी गाडीत बसण्यापूर्वी ठरावधारकाची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
आज सकाळी ११ वाजता सुनावणी
काहीना काही कारणाने निकाल सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर पडत गेली. सोमवारी सर्वोच्च न्यायालयातील एका न्यायाधिशांचा मृत्यू झाल्याने न्यायालयाचे कामकाज झाले नाही. त्यामुळे निर्णय होवू शकला नाही. कोणत्याही परिस्थिती निवडणूक होणार हे जवळजवळ निश्चित मानले जात आहे. तरीही मंगळवारी यचिकाकर्त्यांचे वकील सुनावणी घेण्याची मागणी करणार आहेत. त्यामुळे उद्या काय निर्णय होणार याकडे गोकुळ वर्तुळाचे लक्ष लागले आहे.