केवळ 12 दिवसांत 1 लाखांहून अधिक कुटुंबांची नोंदणी
प्रतिनिधी /पणजी
गृहलक्ष्मी – गोवा ‘टीएमसी’ च्या 11 डिसेंबर रोजी प्रारंभ केलेल्या ’ध्वजधारी ’ (फ्लॅगशिप) योजनेला लोकांमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. फक्त 12 दिवसांच्या कालावधीत 1 लाखाहून अधिक कुटुंबांनी योजनेसाठी नोंदणी केली आहे. मैलाचा दगड साजरा करताना, गोव्यातील ‘टीएमसी’ नेते किरण कांदोळकर, स्वाती केरकर, प्रतिभा बोरकर आणि अधिवक्ता सियोला वास यांनी पणजी येथील ‘टीएमसी’च्या पक्ष कार्यालयात प्रसारमाध्यमांना संबोधित केले आणि त्यांच्या अभूतपूर्व पाठिंब्याबद्दल गोमंतकीयांचे आभार मानले.
राज्यामध्ये सार्वत्रिक ‘कव्हरेज’सह एक कल्याणकारी उपक्रम म्हणून सुरू करण्यात आलेली, ही योजना गोव्यातील सर्व 3.5 लाख कुटुंबांना समाविष्ट करून, प्रत्येक कुटुंबातील एका महिला सदस्याच्या खात्यात दरमहा 5000 रुपये (वार्षिक 60,000 रुपये) हमी उत्पन्न आधार देण्याचे वचन देते.
लोकांच्या भरघोस पाठिंब्याबद्दल आभार मानताना, घरोघरी प्रचारात सक्रिय सहभाग घेणाऱया स्वाती केरकर म्हणाल्या, या योजनेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जेव्हा आपण प्रचाराला जातो तेव्हा महिलांकडून आपल्याला मिळणारा प्रतिसाद हा योजनेच्या यशस्वीतेचा प्रत्यक्ष पुरावा असतो. आमच्या नोंदणीने केवळ 12 दिवसांत 1 लाखांचा आकडा ओलांडला आहे आणि मोठय़ा प्रमाणात लाभ मिळाल्यामुळे अधिकाधिक महिला नोंदणीसाठी पुढे येत आहेत.
या योजनेच्या परिणामाबद्दल बोलताना प्रतिभा बोरकर म्हणाल्या, गेल्या 10 वर्षांत भाजपने आणलेल्या कोणत्याही योजनांचा गोव्यातील महिलांना फारसा फायदा झाला नाही. गोवा ‘टीएमसी’ने महिलांचे सक्षक्तीकरण आणि प्रगतीसाठी ही योजना सुरू केली आहे.’
गोवा ‘टीएमसी’मध्ये नुकतेच सामील झालेले ऍड. सेउला वास यांनी गोव्याच्या कमी होत चाललेल्या व्यवसायाला पुनरुज्जीवित करण्यासाठी ही योजना कशी आवश्यक होती यावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, ‘आम्ही महिलांच्या खिशात पैसे टाकण्याचा प्रयत्न करत आहोत, कारण त्यांना अर्थव्यवस्था कोणापेक्षाही अधिक चांगली माहिती आहे. यासारख्या योजनांमुळे महिलांची क्रयशक्ती वाढेल, त्यामुळे कुटुंबाची आणि राज्याची आर्थिक उन्नती होईल आणि ‘जीडीपी ’ वाढण्यास मदत होईल.’
या महिला-केंद्रित योजनेच्या हेतूबद्दल बोलताना किरण कांदोळकर पुढे म्हणाले की, गोव्यातील महिलांना आर्थिक अडथळे न ठेवता त्यांच्या पायावर खंबीरपणे उभे राहता यावे, हा या प्रकारची कल्याणकारी योजना सुरू करण्यामागील उद्देश आहे. केवळ 12 दिवसांत 1 लाखांहून अधिक कुटुंबांनी नोंदणी केली आहे. गोवा ‘टीएमसी’चे गोमंतकियांचे जीवन अधिक चांगले करण्याचा प्रयत्न आहे. भाजप सरकारची तीव्र उदासीनता लक्षात घेऊन ते पुढे म्हणाले, लोकांचा भाजपवर विश्वास राहिलेला नाही, कारण त्यांनी जनतेच्या जनादेशाचा वारंवार विश्वासघात केला आहे. कोविडच्या काळातही ते लोकांच्या पाठीशी उभे राहण्यात अपयशी ठरले. आगामी निवडणुकीत लोक त्यांचा पाडाव करतील यात शंका नाही.’
अनेक नेत्यांनी मैदानावर सक्रियपणे प्रचार केल्यामुळे, ‘गृहलक्ष्मी’ही राज्याने आजपर्यंत पाहिलेल्या सर्वात प्रगतीशील कल्याणकारी योजनांपैकी एक असल्याचा अंदाज आहे. गोवा ‘टीएमसी’ गोव्यातील लोकांचा विश्वास आणि श्रद्धेबद्दल आभारी आहे. गोवा ‘टीएमसी’ भाजपला हद्दपार करण्याचे आणि गोव्यातील लोक पात्र असलेल्या सुशासन आणि समृद्धीची ‘नवी पहाट’ आणण्याचे वचन देते.