आपच्या महिला शाखेने सावंत सरकारला फटकारले
प्रतिनिधी /पणजी
महिलांवरील वाढत्या गुह्यांमुळे गोवा सध्या महिलांसाठी असुरक्षित बनला असल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाच्या महिला शाखेने सावंत सरकारला फटकारले आहे. अशा परिस्थितीत महिलांना त्वरित न्याय मिळण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करावे तसेच त्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही उपकरणे यासारख्या ठोस उपाययोजना कराव्या अशी मागणी करण्यात आली आहे.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत उपाध्यक्ष ऍड. सुषमा गावडे यांनी सदर मागणी केली आहे. त्यावेळी अध्यक्ष पेट्रिसिया फर्नांडीस आणि रुपा वेरेकर यांचीही उपस्थिती होती. पुढे बोलताना ऍड. गावडे यांनी, ’एकेकाळी सर्वात सुरक्षित राज्य समजल्या जाणाऱया गोव्यात सध्या गुह्यांचे प्रमाण झपाटय़ाने वाढत आहे. राष्ट्रीय सरासरीपेक्षा गोव्यात बलात्कारांचे प्रमाण जास्त आहे’, असा दावा केला. हेच महिला सक्षमीकरण आहे का? असेही त्या म्हणाल्या.
एनसीआरबीने हल्लीच जारी केलेल्या आकडेनुसार देशात बलात्काराचे प्रमाण 4.3 टक्के आहे तर गोव्यासारख्या छोटय़ा राज्यात तेच प्रमाण 7.8 टक्के म्हणजेच दुप्पट आहे. तसेच गोव्यात मानवी तस्करीचीहे सर्वाधिक प्रकरणे आहेत. त्याशिवाय महिलांवरील हिंसाचाराची 95.7 टक्के प्रकरणे प्रलंबित आहेत. अगदी राज्य महिला आयोगही निक्रीय असून कायदा आणि सुव्यवस्था पार कोसळली असल्याची धक्कादायक बाजू समोर आली आहे, असे त्यांनी सांगितले.
सरकारने आतातरी महिलांवरील हिंसा आणि गुह्यांच्या प्रकरणांसाठी विशेष न्यायालय स्थापन करावे. त्याद्वारे गोव्यात महिलांना सुरक्षित वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले.
बाणावली येथील लैंगिक अत्याचार प्रकरणात पीडितेच्या कुटुंबालाच दोषी ठरविणे हे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे अत्यंत बेजबाबदारपणाचे वक्तव्य होते, असा आरोप फर्नांडिस यांनी केला. सिद्धी नाईक प्रकरणातही पोलिसांना अद्याप कोणतेच यश मिळालेले नाही. अशावेळी पीडितांना दोष देण्यापेक्षा स्वतःलाच अपयशी मानत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली.