शिक्षणाधिकारी, तहसीलदारांकडून व्यवस्थापनाचे कौतुक
पालक, विद्यार्थ्यांनी मानले ‘तरुण भारत’चे आभार
सिंधुदुर्गचा गोव्यातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात
मयुर चराटकर / बांदा:
लॉकडाऊनमुळे स्थगित करण्यात आलेली गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची 12 वीची परीक्षा बुधवारपून सुरू झाली आहे. सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी सिंधुदुर्गातील सातार्डा व भेडशी केंद्रावर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. दोन्ही केंद्राला शिक्षणाधिकारी अशोक कडुस, तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी भेट देत तेथील व्यवस्थापनाचे कौतुक केले. ‘तरुण भारत’च्या पाठपुराव्यामुळे सीमाभागात केंद्र मंजूर झाले व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान वाचल्यामुळे विद्यार्थी व पालकांनी ‘तरुण भारत’चे आभार व्यक्त केले.
सिंधुदुर्गमधील गोवा येथे शिक्षणासाठी जात असलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षा गोवा बोर्डाकडून जाहीर करण्यात आल्यानंतर सिंधुदुर्गमधील सुमारे 200 विद्यार्थी चितेंत पडले होते. मात्र ‘तरुण भारत’ने याबाबत वाचा फोडत सिंधुदुर्गमधील त्या चिंतेत पडलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा मार्ग मोकळा केला. एवढय़ा वर्षात कधी न झालेली गोवा बोर्डाची दहावी, बारावीची परीक्षा सिंधुदुर्गमधील सावंतवाडी येथील दोन व दोडामार्गमधील एका पेंद्रावर बुधवारपासून सुरू झाली. यावेळी विद्यार्थी व पालकांनी ‘तरुण भारत’मुळे आमचे होणारे शैक्षणिक नुकसान टळले. असे उद्गार काढत ‘तरुण भारत’चे सदैव आभारी राहू, असे सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक वर्गात सोशल डिस्टन्स राखत 12 विद्याथ्यांचा समावेश करण्यात आला. तसेच उत्तरपत्रिका व प्रश्नपत्रिकाही सॅनिटराईज करण्यात आली.
‘तरुण भारत’ने ‘विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे काय’ अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध करताच सिंधुदुर्ग व गोवा प्रशासनाने त्यावर तोडगा काढत सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांची सिंधुदुर्गातच परीक्षा घेण्याचे निश्चित केले. यासाठी सावंतवाडी व शिरोडा, रेडी, बांदा आदी भागातील विद्यार्थ्यांसाठी सातार्डा महात्मा गांधी प्री
प्रायमरी स्कूल येथे तर दोडामार्ग तालुक्यातील विद्यार्थ्यांची परीक्षा भेडशी केंद्रावर झाली.
‘कमी वेळेत, यशस्वी नियोजन’
सकाळी 9 ते 11.30 या वेळेत बारावीचा पेपर झाला. सातार्डा केंद्रावर केंद्रप्रमुख म्हणून प्रा. सुषमा मांजरेकर यांनी काम पाहिले. शिक्षणाधिकारी अशोक कडूस, तहीलदार राजाराम म्हात्रे, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, केंद्रप्रमुख गवस यांनी परीक्षा केंद्राला भेट देत पाहणी केली. या सर्वाचे केंद्रप्रमुख सौ. मांजरेकर, स्कूल कमिटी चेअरमन उदय पारिपत्ये, गोवा बोर्ड व्हीजिटींग ऑफिसर भिकाजी धुरी, नेहा न्हावेलकर, सागर प्रभू यांनी त्यांचे स्वागत केले. सोशल डिस्टन्स, सॅनिटरायज करून विद्यार्थ्यांना देण्यात आलेली उत्तरपत्रिका व अन्य नियमंचे पालन करीत झालेल्या या परीक्षेबाबत शिक्षणाधिकारी व तहसीलदार यांनी व्यवस्थापनाचे कौतुक केले. ‘अत्यंत कमी वेळेत यशस्वी नियोजन’, अशा शब्दात त्यांनी गौरवोद्गार काढले. व्यवस्थापनासाठी प्रा. नीलेश कामत, पोलीस पाटील सौ. मयेकर, योगेश गोवेकर, परशुराम मांजरेकर, आपा पारिपत्ये, संतोष गोवेकर, सागर राऊळ, संजय जोग आदींनी सहकार्य केले.
‘तरुण भारत’ च्या पाठपुराव्यामुळेच प्रश्न मार्गी!
यावेळी परीक्षा केंद्रातून बाहेर पडल्यानंतर विद्यार्थी व पालकांनी ‘तरुण भारत’च खास आभार मानले. ‘तरुण भारत’ ने याबाबत योग्य पाठपीरावा केला नसता तर आम्ही परीक्षापासून वंचित राहिलो असतो व आमचे शैक्षणिक नुकसानही झाले असते. आता आम्ही समाधानी आहोत. याबाबत पाठपुरावा करणारे सातार्डा माजी सरपंच उदय पारिपत्ये यांचेही त्यांनी आभार मानले.
भेडशी केंद्रावर 50 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
दोडामार्ग : साटेली-भेडशीमधील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज या परीक्षा केंद्रावर 50 मुलांनी परीक्षा दिली. यावेळी मुख्याध्यापिका स्नेहल गवस, नंदकुमार नाईक उपस्थित होते. परीक्षेदरम्यान शिक्षणाधिकारी अशोक कडुस, गटशिक्षणाधिकारी शोभराज शेर्लेकर, नूतन विद्यालय कळणेचे विठ्ठल दळवी, संदीप गवस, पंढरीनाथ देऊलकर, रघुनाथ सोनवलकर, जयवंत सावंत आदी उपस्थित होते. परीक्षा केंद्रासाठी सर्वते सहकार्य करणार असल्याचे सरपंच लखू खरवत व उपसरपंच सूर्यकांत धर्णे यांनी सांगितले आहे.