समुद्र किनाऱयांवर व्यवसाय करणारे 1055 काश्मिरी व्यापारी मूळ गावी जाणार
वार्ताहर / थिवी
रविवार 10 रोजी रात्री 8 वाजता गोव्यातून दुसरी श्रमिक कोकण रेल्वे 1055 प्रवाशांना घेऊन उधमपूरला (जम्मू काश्मिर) थिवी रेल्वे स्टेशनवरून रवाना झाली. या रेल्वेला जिल्हाधिकारी आर. मेनका यांच्याकडून हिरवा कंदिल दाखविण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी दशरथ रेडकर, तारीक थॉमस, दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक गजानन प्रभूदेसाई, उत्तर गोवा पोलीस अधीक्षक उत्कृष्ट प्रसन्नू, तसेच मायग्रेंट सेलचे कुणाल व इतर सरकारी अधिकारी उपस्थित होते.
बिगर गोमंतकीयांना घेऊन जाणारी ही दुसरी रेल्वे थिवी रेल्वे स्टेशनवरून सुटली. यात उत्तर गोवा तसेच दक्षिण गोव्या समुद्र किनारी व्यवसाय करणारे काश्मिरी व्यापारी होते. यावेळी यातील काही व्यापाऱयांना विचारले असता त्यांनी आपण गोव्यात 10 ते 15 वर्षे व्यवसाय करत असून येथून जाताना खुप दुःख होत आहे. गोव्याती लोक शांत स्वभावाचे असून आहला येथे कसलाच त्रास होत नव्हता. येथील व्यवसायवरच आपला उदरनिर्वाह चालतो, असेही ते म्हणाले.
नजीर अहमद यांनी सांगितले की, आपला 15 वर्षे सुरू असलेला व्यवसाय बंद करून आमी आमच्या मूळ गावी जात आहोत. जाताना प्रचंड त्रास होतोय. अचानक झालेल्या लॉकडाऊनमुळे हंगामातील सर्व व्यापारच नष्ट झाला आहे. आमच्याकडे जो काही माल शिल्लक होता तो ज्या ठिकाणी राहत होतो त्या घरमालकांकडे सोपवून नाविलाजाने आम्हाला आमचा गाव गाठावा लागत आहे. अशाप्रकारे आपल्या भागातून आलेल्या सुमारे 900 व्यापाऱयांवर आपला व्यवसाय बंद करून घरी जाण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.
कळंगूट, मोरजी, हरमल तसेच इतर समुद्र किनाऱयावर काश्मिरी आर्ट, हॅण्डलूम तसेच ज्वेलरी विकण्याचा व्यवसाय आम्ही करत होतो. गेली बरीच वर्षे गोव्याच्या भूमीने आम्हाला जगण्यासाठी भरपूर सहकार्य केले. गोव्यातील जनतेने केलेले प्रेम कधीच विसरू शकत नाही, अशाही भावना काही व्यापाऱयांनी व्यक्त केल्या.
जिल्हाधिकारी आर. मेनका यांनी सर्व प्रवाशांना रात्रीचे जेवन व पाण्याची सोय केल्याचे सांगितले. सदर प्रवाशी आपापल्या राज्यात, गावात पोहोचल्यानंतर तेथेही त्यांचे स्वागत होणरा आहे. काही नियमांना अधीन राहून या व्यापाऱयांना आपापल्या घरी पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. गोव्यातील इतर बिगर गोमंतकीयांना सुद्धा आपापल्या राज्यात पोहोचविण्यासाठी गोवा सरकार सहकार्य करणार आहे, असे आर. मेनका म्हणाल्या.