कोरोना विरोधी लढाई जिंकल्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणूका होणार
प्रतिनिधी/ गोडोली
राज्यात एप्रिल ते जून या कालावधीत 1 हजार 570 ग्रामपंचायतीच्या निवडणूका होणार होत्या. जिह्यात 800 हून अधिक ग्रामपंचायतीचा कार्यकाल पूर्ण होत असून त्या सर्व निवडणूका किमान तीन महिन्यासाठी पुढे ढकल्यात आलेल्या आहेत.संबंधीत ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सदरच्या निवडणूका नव्याने सुचना जारी झाल्यानंतर होणार असल्याने जिह्यात ग्रामपंचायतीच्या रणसंग्रामाला स्थगिती मिळाली आहे.कोरोना विरोधातील लढाई जिंकल्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणूका जिंकण्यासाठी 800 हून अधिक ग्रामपंचायती या रंणागणात उतरणार आहेत.
देशभर कोरोनाची धास्ती आणि लॉकडाऊनमुळे सर्वच विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे.राज्यात एप्रिल ते जून या कालावधीत 1 हजार 570 ग्रामपंचायतींचा कार्यकाल संपणार असून त्यात जिल्हयातील 800 हून अधिक ग्रामपंचायतीच्या आहेत. मात्र कोविड-19 मुळे निर्माण झालेली आपत्कालीन परिस्थिती गंभीर असल्याने सदरच्या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र कार्यकाल संपलेल्या ग्रामपंचायतीवर सक्षम प्राधिकारी नेमण्याबाबत ग्राम विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार यांनी याबाबत आदेश दिलेले आहेत.
कोरोना विषाणूमुळे सात रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आगामी 3 महिन्यात होणाऱया स्थानिक स्वराज संस्थाच्या कोणत्याही निवडणूका न घेण्याबाबत मुख्य निवडणूक राज्य आयुक्त यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना कळविले आहे. राज्यातील 19 जिल्हयात 1 हजार 570 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा कार्यक्रम ज्या टप्प्यावर असेल त्या टप्प्यावर पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात येत असल्याबद्दल संबधित जिल्हाधिकाऱयांना आदेश देण्यात आले आहेत.
सातारा जिह्यात 800 हून अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणूका होवू घातल्या आहेत. कोरोना विषाणूमुळे जिह्यात आपत्कालीन परिस्थिती गंभीर आहे. संपूर्ण शासकीय यंत्रणा सध्या युद्धपातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सक्रिय झालेले आहेत. राज्य निवडणूक आयोग आणि शासन आदेश यामुळे सदरच्या निवडणूका पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आलेल्या आहेत.ज्या ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपणार आहे. अशा ग्रामपंचायतीवर सक्षम प्राधिकारी यांची नियुक्ती जिल्हा परिषदेमार्फत होणार आहे.