गूढ शास्त्रातील ग्रंथात ‘चंदेरी धागा तुटणे’ ह्याचाच अर्थ देहांत किंवा मृत्यूची प्रक्रिया. काही प्रमाणात जरी हा संदर्भ बरोबर असला तरी तो पूर्णपणे बरोबर नाही. गेल्या लेखात बघितल्याप्रमाणे या प्रक्रियेत फक्त एक चंदेरी धागा नसून तीन चंदेरी धागे असतात. प्रत्यक्षात हे तीन धागे तुटत नाहीत, तर शरीरातील केंद्रस्थानापासून त्यांचा संपर्क सुटून ते विलग होतात. सुटून विलग होण्याच्या ह्या प्रक्रियेत तिन्ही ध्रुवबिजे पण परत बाहेर काढली जातात. ज्यावेळी असे घडते त्यावेळीच देहाचा अंत होतो.
जीवात्माकडून प्रथम जीवनाचा धागा व त्याच बरोबर असलेले भौतिक ध्रुवबिज शरीरातून विलग केले जाते. उच्चात्म्याकडून भौतिक ध्रुवबिज आणि त्या ध्रुवबिजाचा चंदेरी धागा हळूहळू परत शोषले जाऊन ते स्वतःकडे ठेवले जातात. जीवनाचा चंदेरी धागा व भौतिक ध्रुवबिजे पूर्णपणे शोषून घेण्यास उच्चात्म्याला तीस दिवस लागतात. त्यानंतर विलग होतो तो भावनात्मक चंदेरी धागा. त्याचबरोबर भावनात्मक ध्रुवबिज पण विलग होते. सर्वात शेवटी विलग होतो तो जागृत चैतन्याचा चंदेरी धागा आणि मानस ध्रुवबिज. जेव्हा तिन्ही ध्रुवबीजे विलग होऊन त्यांचे संबंधित चंदेरी धागे सुटे होतात तेव्हा भौतिक शरीर मृत होते.
वासनादेह किंवा भावनिक कोषसुद्धा अमर नसतो. तो सुद्धा मरण पावतो. जेव्हा वासनादेह मृत होतो तेव्हा जीवात्मा भावनात्मक आणि जागृत चैतन्याचे बीज ही दोन्ही ध्रुवबिजे विलग करून त्यांचे संबंधित चंदेरी धागे पण सुटे करतो. वासनादेहातून ते बाहेर काढले जातात. असे घडते की वासनादेह पण मरण पावतो. भावनात्मक ध्रुवबिज आणि त्याचा चंदेरी धागा, दोन्ही हळूहळू आत्म्यात शोषले जातात. कनि÷ किंवा निम्नस्तरीय मनोदेह किंवा मनोमय कोष पण अमर नसतो. तो पण मरण पावतो. जेव्हा जागृत चैतन्याचे बीज किंवा मानस ध्रुवबिज व त्याच्या संबंधित चंदेरी धागा आत्मा परत ओढून घेतो तेव्हा कनि÷ मनोदेहाचा मृत्यू ओढवतो. जागृत चैतन्याचे बीज व त्याचा चंदेरी धागा हे पण हळूहळू उच्चात्म्यात शोषले जातात. उच्चात्म्याचे वास्तव्य ज्ये÷ मनोदेहात असते. त्या देहाला कारण शरीर असे पण म्हणतात. त्या सूक्ष्म देहात मानवाच्या हातून घडणारी कर्मे नोंदवली जातात. आत्म्याची ‘आकाशीय नोंदपत्रिका’ म्हणजेच कारणदेह किंवा कारणशरीर.
उच्चात्म्याकडून तीन ध्रुवबीजे गोळा करून ती साठवून ठेवली जातात आणि भविष्यकाळातील पुनर्जन्मासाठी त्यांचा उपयोग केला जातो. म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे, की माणूस जसा रोज वस्त्र बदलतो त्याचप्रमाणे आत्मा प्रत्येक जन्मात नवीन शरीर धारण करतो. शरीर बदलण्याच्या प्रक्रियेसाठी तीन ध्रुवबीजे तसेच त्यांच्या संबंधित तीन चंदेरी धाग्यांची गरज असते.
जन्म, मृत्यू, पुनर्जन्म हे मनुष्याला आजवर पडलेलं कोडं आहे. ह्या कोडय़ाची प्रत्येक व्यक्तीकडे वेगवेगळी उत्तरे देखील आहेत. बऱयाच पुस्तकांमध्ये याविषयी उघडपणे चर्चा केलेली आहे. सुरुवातीला काही गोष्टी चमत्कारिक वाटतात. त्यावर विश्वास बसत नाही पण जेव्हा आपण प्रत्यक्षात अनुभवतो, तेव्हा सगळय़ाच गोष्टींचे आपल्याला पटकन आकलन होते. Pranic Healing च्या Soul Realisation या वर्गात तुम्हाला meditation on blue pearl शिकवले जाते. Blue pearl म्हणजेच नीलमणी किंवा जागृत चैतन्याच्या बिजावर ध्यानधारणा करून साधकाला आपल्या उच्चात्म्याबरोबर संबंध प्रस्थापित करता येतो. त्यामार्गे अंतर्विश्वसृष्टीत तसेच आंतरिक ब्रह्मांडात प्रवेश मिळण्याची वाट मोकळी होते. त्यानंतर अनेक थोर महात्मे आणि गुरुजनांशी संपर्क साधता येतो आणि त्यांच्याकडून स्वतःसाठी अनमोल ज्ञानप्राप्ती व आशीर्वाद घेता येतात.
स्वामी मुक्तानंदाना अनेक वर्षांच्या आध्यात्मिक साधनेनंतर नीलमण्याचे दर्शन झाले. काही काळानंतर त्यांना नील पुरुष दिसला. तो नील पुरुष म्हणजे त्यांच्याशी संपर्क साधणारा त्यांचा उच्चात्मा होता. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की , ध्यानधारणा करून जर आपण उच्चात्म्याशी एकरूप होता येतं मग सगळेच का नाही एकरूप होत. असं का होतं की एखाद्याला परमेश्वराशी गप्पा मारता येतात तर एखाद्याला काहीच जाणवत नाही. वाचकहो, आपल्या सगळय़ांकडे आता टीव्ही आहेत, टीव्हीवर विविध चॅनल दिसतात ज्यांच्या frequency चे आपण पैसे भरलेत. अगदी सोपे म्हणजे radio सगळीकडे चालत नाही, त्याच्या ठराविक frequency आहेत चॅनल आहेत. तुम्ही योग्य frequency ला जोडले गेलात तरच radio लागेल…हो की नाही? अगदी तसंच आपण ध्यानधारणा आपली योग्य frequency गाठेपर्यंत करायची. एकदा का तुमचं चॅनल ओपन झालं की, तुमचा उच्चात्मा तुमच्याशी गप्पा नक्की मारेल. नीलमणी वर केली जाणारी ध्यानधारणा हे एकप्रकारे channelling करण्यासारखं आहे.
हा निलमणी कसा दिसतो? आपल्या शरीरात तो आहे का? असेल तर तो कसा शोधायचा? ह्या सगळय़ा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला pranic healing च्या वर्गात मिळतील. Pranic Healing चे meditation नियमित केल्यास तुम्हालाही काही अनुभव निश्चितच येतील.
-आज्ञा कोयंडे