थंडीच्या दिवसात सकाळी उठलं की, निसर्ग, आजूबाजूची झाडं, डोंगर सगळीकडेच धुकं असतं3 डोळ्यांना दिसायला अगदी छान असतं. पण जसजसं ते धुकं कमी होत जात तसतसं आपल्याला भोवतालच्या गोष्टी अधिक स्पष्ट दिसू लागतात. कोणा व्यक्तीच्या प्रेमात पडलं की अगदी तसंच काहीसं होत नाही का ? कधीही न भेटलेला व्यक्ति आपल्याला आवडायला लागतो आणि आपण नकळत त्याच्या प्रेमात पडतो. तिथून हळुवार फुलणाघ्&या प्रेमकहाणीला सुरुवात होते… कधी लुकलुकत्या चांदण्यात तर कधी चंद्राच्या मंद प्रकाशात त्याचा हात हातात घेऊन आपण पुढच्या प्रवासाची स्वप्नं रंगवू लागतो. आपण त्या व्यक्तीच्या इतक्या प्रेमात पडलेलो असतो की, वास्तव्य समोर असून देखील आपण ते उघडय़ा डोळ्याने बघू शकत नाही किंवा दिसलं तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.
अशीच हळुवार प्रेमकहाणी सुरू होते आपल्या स्वाती आणि श्रीधरमध्ये पण यांच्या कथेला रहस्याची किनार आहे. काय असेल हे रहस्य ज्यामुळे स्वातीचे आणि त्याचसोबत श्रीधरचे संपूर्ण आयुष्य बदलून जाणार आहे? येत्या 11 नोव्हेंबरपासून जाणून घेण्यासाठी चिन्मय मांडलेकर लिखित आणि मुळाक्षर प्रॉडक्शन निर्मित ’चंद्र आहे साक्षीला ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता कलर्स मराठीवर भेटीला येणार आहे श्रीधरची भूमिका आपल्या सगळ्यांचा लाडका सुबोध भावे साकारणार असून स्वातीची भूमिका ऋतुजा बागवे निभावणार आहे. आपल्या कथेतील स्वाती मध्यमवर्गीय, अतिशय सोशिक, साधी सरळ… फसवणुकीवर उभं असलेलं नातं पत्याच्या बंगल्यापेक्षा तकलादू असतं असे तिचे म्हणणे आहे आणि याचमुळे स्वभवाने चांगली असून देखील वयाच्या 34व्या वर्षी देखील स्वाती अविवाहित आहे. अशाच स्वातीच्या आयुष्यात श्रीधर नकळतपणे येतो आणि तिचे संपूर्ण आयुष्य बदलून जातं… दोघांमधील प्रेम हळूहळू फुलू लागतं. जसजसे दिवस पुढे सरकू लागतात एकमेकांवरच प्रेम आणि विश्वास वाढू लागतो आणि दोघे लग्न करण्याचा निर्णय घेतात… या दोघांचे आयुष्य नक्की कोणाच्या आणि कोणत्या रहस्याने पुर्णपणे बदलून जाणार ? स्वाती आणि श्रीधरच्या या पिक्चर परफेक्ट जगात नक्की काय घडणार ? हे लवकरच आपल्याला कळणार आहे.
आपल्या भूमिकेविषयी आणि मालिकेविषयी बोलताना सुबोध भावे म्हणाला, मालिकेविषयी सांगायच झालं तर मला असं वाटत इच्छा असते पण ती पूर्ण करण्याचे प्रत्येकाचे मार्ग वेगळे असतात. काही रुळलेल्या वाटा शोधतात तर काही स्वत: च्या निर्माण करतात.