17-18 रोजी वादळी वाऱयासह अतिमुसळधार पाऊस शक्य : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
आग्नेय अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे केरळ तसेच लक्षद्वीप किनाऱयावर चक्रीवादळ निर्माण होऊन त्याची तीव्रता वाढत जाण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. तसेच या वादळाचा परिणाम 15 ते 17 मे दरम्यान दक्षिण कोकण व गोव्याच्या किनाऱयावरही होण्याची शक्मयता आहे. तसेच 15 व 16 मे रोजी जिल्हय़ात जोरदार वाऱयासह मुसळधार पावसाची शक्मयता वर्तवण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी सतर्क राहवे, असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये दिले आहेत.
या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस ठाण्यांचे प्रभारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
तालुकास्तरीय अधिकाऱयांनी सतर्क राहावे, अशा सूचना देऊन जिल्हाधिकारी म्हणाल्या, मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये. सध्याच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये जिल्हय़ातील कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल्स यांचा विद्युत पुरवठा खंडित होणार नाही, यासाठी नियोजन करावे. नागरिकांचे स्थलांतर करायचे झाल्यास त्यासाठी निवारा केंद्राचे नियोजन करावे, किनारपट्टीच्या सर्व तालुक्मयांमधील शोध व बचाव पथके तैनात करण्यात यावीत. जिल्हय़ात होणारा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहवा, या दृष्टीने मुसळधार पावसामुळे झाडे पडल्यामुळे रस्ते बंद होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. झाडे पडल्यास ती तात्काळ दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने यंत्रणा तयार ठेवावी. विशेषतः घाट रस्त्यांमध्ये पथके तैनात राहतील, असे पाहवे. घाटरस्ते पूर्णवेळ सुरू राहतील, याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना यावेळी जिल्हाधिकाऱयांनी दिल्या.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनुसार लक्षद्वीप बेटे, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, दक्षिण कोकण, गोवा आणि गुजरात राज्यात 15 ते 18 मे या काळात वादळाचा प्रभाव जाणवणार आहे. या काळात दक्षिण कोकणमध्ये वाऱयाचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर इतका राहण्याची शक्मयता आहे. 15 व 17 मे या कालावधीमध्ये जिल्हय़ात विजांच्या कडकडाट, वेगवान वारे यासह मुसळधार पावसाची शक्मयता वर्तवण्यात आली आहे. वाऱयाच्या वेगामध्ये ताशी 60 कि. मी. पर्यंत वाढ होण्याचीही शक्मयता आहे. 15 मे रोजी वाऱयाचा वेग 70 कि. मी. पर्यंत वाढू शकतो, असेही या इशाऱयामध्ये सांगितले आहे. त्याशिवाय 15 ते 18 मे दरम्यान समुद्र खवळलेला राहणार आहे. समुद्रामध्ये व किनाऱयावर या काळात मोठय़ा लाटा निर्माण होणार आहेत. त्या अनुषंगाने मच्छीमारांनी या काळात मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये. वादळाची दिशा आणि वेग यावर प्रशासनाने लक्ष द्यावे. बचाव साहित्य अद्ययावत ठेवावे, अशा सूचनाही या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या.
17-18 रोजी अतिमुसळधार
कणकवली : दरम्यान, जिल्हा कृषी हवामान केंद्र तथा ग्रामीण कृषी मौसम केंद्र, मुळदेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रदीप हळदवणेकर व डॉ. यशवंत मुठाळ यांनी 17 व 18 रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. डॉ. मुठाळ म्हणाले, 17 व 18 रोजी बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विषूववृत्तीय व आग्नेय अरबी समुद्रामध्ये लक्षद्विपजवळ 13 मे रोजी समुद्र सपाटीपासून 3.1 किमी उंचीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. 14 व 15 रोजी ते अधिक सुस्पष्ट होऊन त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे.