महाड / प्रतिनिधी
कोरोना मुळे सर्व समान्यांच्या जीवना मध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेंत,अनेकांची रोजीरोटी थांबलेली आहे, अश्या कुटूंबांच्या घरांमध्ये खायला अन्न नाही, समाजांतील गोर गरीबांसाठी आपण जीवनावश्यक वस्तुचे वाटप करीत आहोत, समाजा साठी चागले काम करीत असताना जर गुन्हा दाखल झाला तरी आपल्याला त्याची पर्वा नाही असे प्रतिपादन महाडचे आमदार भरत गोगावले यांनी केले.
महाड तालुक्यांतील त्याच बरोबर शहरांतील गरीब गरजु कुटूंबांना आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितींत जीवनावश्यक वस्तुंचे वाटप गेल्या कांही दिवसा पासुन सुरु आहे. आता पर्यत सुमारे दहा हजारा पेक्षा अधिक कुटूंबांना मदतीचा हात आ.गोगावले यांनी दिला आहे.शंहरांतील नवेनगर, काकरतळे मोहल्ला, गांधारी नाका, या परिसरांतील कुटूंबाना वस्तुंचे वाटप नुकतेच करण्यांत आले. दोन दिवसा पुर्वी मुस्लिम बांधवांचा पवित्र रमझान महिना सुरु झाला असुन शहरांतील १६०० कुटूंबाना मदत करण्यांत आली. यावेळी आमदार गोगावले यांच्यास नगरसेवक दिपक सावंत, शहर प्रमुख नितीन पावले,स्विकृत नगरसेवक डॉ.चेतन सुर्वे,युवा सेनेचे महाड शहर अधिकारी सिध्देश पाटेकर यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी कार्यकत्यांशी सवांद साधत असताना म्हणाले, कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशांमध्ये सर्वत्र लॉकडाऊन जाहिर करण्यांत आल्या नंतर समाजांतील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटूंबांच्या समोर अनेक समस्या उभ्या राहील्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देण्याचे काम आपण करीत असल्याचे आ.गोगावले म्हणाले.कांही लोक घराच्या खिडक्या लाऊन घरांतच बसले आहेत, आणि आपल्या विरोधांमध्ये तक्रारी करीत आहेत, परंतु जनते करीता चांगले काम करीत असताना गुन्हा दाखल झाला तरी आपल्याला त्याची पर्वा नाही असे सडेतोड उत्तर कोणाचेही नाव न घेता दिले. महाड, माणगाव आणि पोलादपुर येथील विक्रम आणि तीन आसनी रिक्षा चालकांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप नुकतेच करण्ंयात आले असुन या पुढे मतदीचे वाटप कायम सुरुच राहाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारी धान्याचे वितरण योग्य प्रकारे सुरु करण्यांत आले असुन अधिकाधिक कुटूंबा पर्यत सरकारी धान्य पोहोचविण्याचे काम करण्यांत येत आहे.ज्यांना धान्य मिळाले नाही त्यांनी तहसिलदार कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन देखिल त्यांनी केले आहे. लोकप्रतिनिधी म्हणुन महाड मतदार संघातील जनतेचे जो विश्वास व्यक्त केला आहे तो सार्थकी ठरविण्यासाठी आपण सर्व प्रकारे प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.