दत्ता कोळी / मायणी
यंदाच्या जोरदार पावसाने दुथडी भरून वाहणाया चांद नदीत लक्ष्मीनगरकडे जाणाया पुलावरून शनिवारी सकाळी एक युवक वाहून जाण्याची घटना घडली. उपस्थित युवकांनी वेळीच प्रसंगावधान राखून या युवकाचे प्राण वाचवले असून गेल्या दीड महिन्यातील ही तिसरी घटना असून वाहून जाणायाचे प्राण उपस्थित युवकांनी वाचवल्याने आजवर जीवितहानी झाली नाही.
याबाबत सविस्तर माहिती अशी, शनिवार सकाळी साडेसात वाजता संभाजी जानकर हा युवक नेहमीप्रमाणे या पुलावरून मार्गक्रमण करीत असताना अचानक वाढलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी सह वाहून जाऊ लागला. दुचाकी पुलावरील कठडय़ाला अडकून पडली व संबंधित युवक पुलावरून पाण्यात पडला. यावेळी जवळील वस्तीवरील शशिकांत घाडगे, नानासो माळी,महादेव माळी यांना प्रसंगावधान राखून दोरखंडाच्या साहाय्याने जानकर यांचे प्राण वाचवण्यात यश आले.
मायणी गावाचाच भाग असणाया लक्ष्मीनगर या भागाकडे जाणाया रस्त्यावरील कमी उंचीच्या दगडी पूलावरून पंधरा दिवस कमी-जास्त प्रमाणात होऊन सातत्याने वाहतूक खंडित होत आहे. पर्यायी रस्ता नसल्याने व सतत च्या पावसामुळे चांद नदीला सातत्याने पूर येत असल्या कारणाने लक्ष्मीनगर,दगडेमळा,थोरात वस्ती,जानकर वस्ती या भागातील नागरिकांचे हाल होत आहेत.
लक्ष्मीनगरचा पूल कमी उंचीचा असून सातत्याने याठिकाणी असे अपघात होत आहेत.मागील 10 दिवसा पूर्वीही संदीप दगडे हा युवक वाहून जात असताना नवनाथ थोरात व इतर युवकांनी त्या युवकांचा प्राण वाचवला होता.
गेल्या दीड महिन्यात अशी तिसरी घटना असून परिसरातील ग्रामस्थांनी या पुलावर पाणी आल्यास वाहतूक करू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. संबंधित युवकांचे प्राण वाचवणाया शशिकांत घाडगे,नवनाथ थोरात,महादेव माळी,नानासो माळी या युवकांचे गावातून कौतुक करण्यात येत आहे.