प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगाला हादरा बसला आहे. बेळगावातही अनेक उद्योगधंद्यांना चांगलाच फटका बसला असून आता काही प्रमाणात आर्थिक घडी बसत आहे. बेळगाव आरटीओ विभागाला कोरोना काळात तब्बल 15 कोटींचा फटका बसला होता. त्यामुळे ही कसर भरून काढण्याचे मोठे आव्हान अधिकाऱयांसमोर उभे ठाकले होते. मात्र, आता चार दिवसांत आरटीओ विभागाला 4 कोटींचा कर मिळाल्याची माहिती आरटीओ शिवानंद मगदूम यांनी दिली.
बेळगाव तालुक्मयातील वाहनांच्या खरेदीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असून आरटीओ कार्यालयात नोंदही होत आहे. अनेक वाहनांचे थकीत करही भरण्यात येत असल्यामुळे मागील चार दिवसांपासून प्रत्येक दिवसाला 1 कोटीप्रमाणे महसुलात भर पडत आहे. येत्या दिवाळीपर्यंत कर भरून काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. दिवाळी संपेतोवर कोरोना काळात बसलेला आर्थिक फटका भरून काढण्यासाठी याचा फायदा होणार आहे.
दरवषी बेळगाव आरटीओ कार्यालयात तब्बल 20 कोटींहून अधिक कर मिळत असतो. मात्र यावषी कोरोनामुळे सर्वच व्यवहार आणि वाहन नोंदणी तसेच वाहन परवाना देणे बंद असल्याने समस्या निर्माण झाली होती. ही कसर कशी भरून काढायची याकडे अधिकाऱयांनी लक्ष वेधले. कर भरून काढण्यासाठी प्रयत्न झाले. आता बेळगाव शहरातील व खानापूर तालुक्मयात वाहने घेण्याचे प्रकार वाढल्याने महसुलात वाढ होत आहे. मागील चार दिवसांपासून आरटीओ कार्यालयात 4 कोटींचा महसूल जमा होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. सरकारच्या तिजारीत महसूल जमा होत आहे.
महसुलात वाढ होण्यासाठी प्रयत्न
कोरोनामुळे आरटीओ विभागाला तब्बल 15 कोटींचा फटका बसला होता. ही कसर भरून काढणे आमच्यासमोर आव्हानच होते. त्यामुळे आम्ही दसरा आणि दिवाळीकडे लक्ष वेधले होते. मात्र, कोरोनाची धास्ती कायम असल्यामुळे दसऱयातही नागरिकांनी वाहन खरेदीकडे दुर्लक्ष केले होते. आता मात्र दिवाळीच्या शुभमुहुर्तावर वाहन खरेदी करून नोंदणी तसेच वाहन परवान्यासाठी मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे महसुलात वाढ होत असून मागील चार दिवसांत 4 कोटींचा महसूल जमा झाला आहे, असे आरटीओ शिवानंद मगदूम यांनी सांगितले.