कोलंबो
समुद्रामध्ये विविध देशांच्या निवडक सीमा निश्चित करण्यात आलेल्या असतात. परंतु काही कारणास्तव मच्छिमारांनी जर एखादी समुद्रातील सीमा ओलांडल्यास संबंधीत देश अशा मच्छिमारांना बंदीस्त करुन ठेवत असतो. अशीच एक घटना भारतासंबंधी घडलेली असून यामध्ये श्रीलंकेच्या नौदलाने देशातील जल क्षेत्रात घुसखोरी केल्याच्या कारणास्तव 54 मच्छिमारांना अटक केली होती. परंतु त्यांची आता सुटका करण्यात आली आहे. भारतीय अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास 40 लोकांची शुक्रवारी सुटका केली असून मुख्य 14 मच्छिमारांना शनिवारी सकाळी सोडण्यात आल्याची माहिती आहे. श्रीलंकेच्या नौदलाकडून 24 मार्च रोजी भारतीय मच्छिमारांना अटक करण्याची कारवाई केली होती. तेव्हा त्यांच्या पाच नौकाही ताब्यात घेतलेल्या होत्या. सदरच्या मच्छिमारांची सुटका करण्यात आल्यानंतर त्यांच्यासोबत कोलंबो येथील भारतीय उच्चायुक्तामधील राजदूतांनी संबंधीत मच्छिमारांना आवश्यक ती मदत केली.