प्रतिनिधी / चिकोडी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुकारलेल्या लॉकडाऊनच्या नियमावलीचे पालन न करता नियमांचे उल्लंघन करीत अनावश्यकपणे, विना मास्क रस्त्यावर वाहने घेऊन फिरणाऱयांवर कारवाई करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात 350 हून अधिक दुचाकी व चारचाकी वाहने जप्त करण्यात आली असल्याची माहिती चिकोडीचे मंडल पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील यांनी दिली.
चिकोडी येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. वाहने घेऊन आनावश्यक फिरू नये अशी सूचना देण्यात येऊनही अनावश्यकपणे रस्त्यावर फिरत असलेली चारचाकी व दुचाकी वाहने पकडण्यात आली आहेत.
कोरोनाचे नियम पाळावेत यासाठी पोलीस रस्त्यावर उतरून कार्य करीत आहेत. चिकोडी तालुक्मयात अनावश्यक रस्त्यावर फिरणारी वाहने जप्त करण्यात येत आहेत. लॉकडाऊनच्या काळात अनावश्यक वाहने रस्त्यावर येणार नाहीत यासाठी पोलिस सज्ज करण्यात आले आहेत. नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करून पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन पाटील यांनी केले.