वाळपई / प्रतिनिधी :
गोवा बेळगाव दरम्यानच्या चोर्ला घाट परिसरांमध्ये कोसळलेल्या दरडी हटविण्यात आल्या असून या भागातून वाहतूक सुरळीतपणे सुरू सुरू झाली आहे.
बुधवारी सकाळी कोसळलेला सर्व दरडी दूर करण्यात आलेले आहेत. याबाबतची माहिती अशी की बुधवारी सकाळी व बेळगाव दरम्यानच्या चोरला घाट परिसरात गोवा हद्दीमध्ये तीन ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. त्यामुळे जवळपास सहा तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
सदरची दरडीची माती पूर्णपणे रस्त्यावर आल्यानंतर रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे पडली होती. सध्यातरी सदर अडथळे दूर करण्यात आले असून मार्गावर कोणत्याही प्रकारचा अडथळा नसल्याचे सार्वजनिक रस्ता विभागाचे साहाय्यक अभियंता देवेंद्र वेलिंगकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.
बुधवारच्या तुलनेत गुरुवारी पावसाचे प्रमाण बऱयाच प्रमाणात कमी होते. त्यामुळे सदर भागांमध्ये प्रकारची दरडी कोसळण्याचे प्रकार घडलेले नाहीत. तरीसुद्धा यामार्गावर पूर्णपणे देखरेख ठेवण्यात येत असून खात्याच्या खास कर्मचाऱयांची सदर भागात नियुक्त करण्यात आल्याचे देवेंद्र वेलिंगकर यांनी स्पष्ट केले. तरीसुद्धा सदर भागातील वाहतूक करणाऱया प्रवाशांनी सावधगिरीने प्रवास करावा अशा प्रकारचे आवाहन करण्यात आलेले आहे. गेल्या काही वर्षापासून सदर भागातील दरडी म्हणजे पावसाळी मोसमात प्रवाशांसाठी मोठय़ा प्रमाणात धोका निर्माण होताना दिसत आहे. यामुळे सरकारने सदर दरडीबाबत कायमची उपाययोजना करण्याची मागणी सातत्याने नागरिक करताना दिसत आहेत. मात्र गोवा सरकारने यासंदर्भात अजिबात लक्ष दिलेले नाही. याबाबत अधिक माहिती देताना देवेंद्र वेलिंगकर यांनी सांगितले की गोवा बेळगाव दरम्यानच्या साखळी ते गोवा हद्दीपर्यन्त नव्याने हॉटमिक्स डांबरीकरणाची निविदा मंजूर करण्यात आलेली आहे. यामुळे पावसाळय़ानंतर याकामाला प्रारंभ होणार असल्याचे समजते. केंद्रीय रस्ता खात्यातर्फे हा निधी मंजूर करण्यात आला असून त्यातून यारस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
गोवा बेळगाव दरम्यान व्यवसायिक स्तरावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक होत असते. सध्यातरी covid-19 रोगाची महामारी असल्यामुळे वाहनांची वर्दळ बऱयाच प्रमाणात कमी असली तरी खासकरून लग्नाच्या समारंभात मोठय़ा प्रमाणात या भागातून वाहतूक होताना दिसत आहे. सदर मार्ग पूर्णपणे सुरक्षित व कमी पल्याचा असल्यामुळे वाहनांची संख्या भागातून मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे उघडकीस आलेले आहे. यामुळे यारस्त्यावरील उपायोजना करण्याबरोबरच प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही याची विशेष दखल घेऊन उपाययोजना होण्याची गरज आहे.
सध्यातरी पावसाळी मोसमात रस्त्यावर कोणत्या प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही. यासाठी पोलीस यंत्रणेतर्फे सातत्याने देखरेख करण्यात येत असल्याचे पोलीस यंत्रणेने स्पष्ट केलेले आहे.