प्रतिनिधी/ सातारा
dछत्रपती शाहु महाराजांची समाधी अतिशय देखणी अशी आहे. दर्जेदार अशी आहे. सुंदर आणि कलात्मक दृष्टीकोनातून बांधली गेली आहे. त्यामध्ये अनेक लोकांचा सहभाग आहे. महापुरुषांची समाधी असायलाच पाहिजे. समाजासाठी त्यांचे योगदान आहे. त्यांचे कार्यपद्धतीने त्यांचे विचार, त्यांचे संस्कार यांच्यातुन नव्या पिढीला उर्जा मिळते. ही प्रेरणा आहे.छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावर जी समाधी आहे त्या पद्धतीने शाहु महाराजांची समाधी बांधण्यात आली आहे, असे गौरवोद्गार राजमाता कल्पनाराजे यांनी काढले.
संगममाहुली येथे छत्रपती शाहु महाराजांच्या समाधीचे लोकार्पण सोहळय़ावेळी त्या बोलत होत्या. यावेळी डॉ. संदीप महिंद गुरुजी, संदीपभाऊ शिंदे, राजूशेठ राजपुरोहित, इतिहास संशोधक भगवानराव चिले, सुजाता राजेमहाडिक, रंजना रावत, गितांजली कदम, अजय जाधवराव, शिवराज्य उत्सव समितीचे दीपक प्रभावळकर, सुदामदादा गायकवाड, शिरीष चिटणीस आदी मान्यवर उपस्थित होते.
राजमाता कल्पनराजे भोसले, छत्रपती शाहु महाराजांची समाधी अतिशय देखणी अशी आहे. दर्जेदार अशी आहे. सुंदर आणि कलात्मक दृष्टीकोनातून बांधली गेली आहे. त्यामध्ये अनेक लोकांचा सहभाग आहे. दगड विविध ठिकाणाहून आणले गेले आहेत. आर्किटेक्ट, त्यांचे सहकार्य यांनी चांगले काम केलेले आहे. अजय जाधवराव आणि राजपुरोहित यांनी स्वतः प्रयत्न करुन लोकसहभागातून या समाधीचे काम करण्यात आले आहे. हे करण्याचे कारण म्हणजे महापुरुषांची समाधी असायलाच पाहिजे. समाजासाठी त्यांचे योगदान आहे. त्यांचे कार्यपद्धतीने त्यांचे विचार, त्यांचे संस्कार यांच्यातुन नव्या पिढीला उर्जा मिळते. ही प्रेरणा आहे. जीवनात उपयोगी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी राज्य केलं. छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावर जी समाधी आहे त्या पद्धतीने शाहु महाराजांची समाधी बांधण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
अजय जाधवराव म्हणाले, कवी भूषण आपल्या साताऱयाबाबत इतक सुंदर लिहतात की त्यांच्या प्रत्येक वाक्यात शाहु महाराज आहेत. छत्रपती शाहु महाराजांचे सैन्य दिल्लीमध्ये असं फिरत आहे. एखाद्या वराडयाप्रमाणे सजून फिरत असल्याचे दिसत आहे. दिल्ली शहर हे सातारा शहराची दुल्हन दिसत आहे. सातारा शहराचे महात्म कवी भूषणांनी सांगितले आहे. दिल्लीला सातारा शहराची भार्या करणं, बायको करणं. हे त्याकाळी केवढ मोठं वाक्य अभिमानास्पद आहे. सातारा शहर हे एकमेव अजिंक्य शहर आहे, असे त्यांनी सांगितले.
संगममाहुलीमध्ये वातावरण झाले इतिहासमय संगममाहुलीला अजरामर असा इतिहास आहे.. अनेक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहु महाराज यांच्या भेटीचा उल्लेख इतिहासात आढळून येतो. याच संगममाहुलीत शाहु महाराजांच्या समाधीचा जीर्णोध्दार करुन लोकार्पंण सोहळा आज अभूतपूर्व असा रंगला. या सोहळय़ाच्या निमित्ताने आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पोवाडे, सनई चौघडे लावण्यात आले होते. सर्व वातावरणच ऐतिहासिक असे बनून गेले होते.