छत्री 110 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत तर 350 ते 1700 रुपयांपर्यंत रेनकोट उपलब्ध
प्रतिनिधी /बेळगाव
लॉकडाऊननंतर अनलॉक करण्यात आल्याने बाजारपेठेत सकाळपासूनच गर्दी झाली होती. सध्या पावसाचे दिवस असल्याने नागरिकांनी सर्वप्रथम छत्री, रेनकोटची खरेदी केली. त्यामुळे छत्री, रेनकोट व्यापाऱयांच्या दुकानात खरेदीसाठी गर्दी झाली होती.
सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवडय़ापासून संततधार पाऊस पडत असून पावसापासून संरक्षण व्हावे, यासाठी अनेकांनी सोमवारी छत्री-रेनकोटची खरेदी केली. गतवषीच्या तुलनेत यावषी छत्री-रेनकोटच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
छत्री 110 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत असून रेनकोट 350 ते 1700 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तसेच यामध्ये वेगवेगळय़ा व्हरायटी असून महिला, पुरुष आणि लहान मुलांसाठी वेगवेगळय़ा किमतीत व्हरायटी आहेत. तसेच सध्या शैक्षणिक वर्ष सुरू नसल्याने पालकांनी छत्री-रेनकोटची खरेदी केली नसल्याने व्यापाऱयांना मोठा फटका बसला आहे. मात्र कामगारवर्ग, महिला यांनी छत्री- रेनकोटची खरेदी केल्याचे यावेळी दिसून आले.
एप्रिल महिन्यात लॉकडाऊन करण्यात आल्याने सर्व काही बंद करण्यात आले. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती. त्यामुळे नागरिकांना इतर साहित्य खरेदी करण्याची मुभा न मिळाल्याने समस्या निर्माण झाली होती. सोमवारी अनलॉक करण्यात आल्याने सर्व दुकाने उघडण्यात आली. यावेळी नागरिकांनी सर्वप्रथम छत्री-रेनकोटच्या खरेदीसाठी गर्दी केली.
जुन्या छत्र्या दुरुस्ती करण्यावर नागरिकांचा भर
लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थिती बेताची झाल्याने काही नागरिकांनी आपल्या जुन्याच छत्र्या दुरुस्ती करण्यावर भर दिला होता. नवीन छत्री खरेदी करण्याऐवजी जुन्या छत्रीची काठी, मूठ बदलून घेण्यात आली. त्यामुळे छत्री दुरुस्ती करणाऱयांना लॉकडाऊननंतर चार पैसे मिळाल्याचे दिसून आले.
यावषी छत्री-रेनकोटच्या किमतीत वाढ -किरण पवार-ग्राहक
गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने समस्या निर्माण झाली. अनलॉकमुळे नागरिकांनी सर्वप्रथम कुटुंबासाठी रेनकोट आणि छत्र्यांची खरेदी केली. संततधार पावसामुळे छत्रीविना बाहेर पडणे मुश्कील झाले होते. तसेच गेल्या वषीच्या तुलनेत यावषी छत्री-रेनकोटच्या किमतीत वाढ झाली असल्याचे यावेळी बोलताना ते म्हणाले.
अद्याप शाळा सुरू नसल्याने व्यवसायाला फटका -एच. बी. पोरवाल ऍण्ड सन्स
शैक्षणिक वर्ष सुरू नसल्याने यावषी व्यवसायाला फटका बसला आहे. तसेच ही परिस्थिती गेल्यावषीपासून अशीच असून समस्या निर्माण झाली आहे. मात्र कामगारवर्ग, महिला छत्री-रेनकोटची खरेदी करत असल्याने 70 टक्के व्यवसाय होत आहे. परंतु शैक्षणिक वर्ष बंद असल्याने 30 टक्के नुकसान झाले आहे.
पहिल्याच खरेदीसाठी गर्दी -सचिन सदरे-विपेते
लॉकडाऊन करण्यात आला असला तरी दुकानात पावसाळी साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. अनलॉकमुळे नागरिक घराबाहेर पडून खरेदी करत असल्याने पहिल्याच दिवशी दुकानात खरेदीसाठी गर्दी झाली होती. मात्र लहान मुलांच्या रेनकोटची विक्री बंद असल्याने समस्या निर्माण झाली आहे.