वार्ताहर /खानापूर
जंगल संपत्ती ही खानापूर तालुक्मयाला लाभलेले एक मोठे वैभव आहे. उत्तर कर्नाटकातील भागात खानापूरसारखा दुसरा जंगल भाग नाही. त्यामुळे या भागात समृद्ध आरोग्यासाठी खऱया अर्थाने लाभलेले वैभव म्हणजे या भागातील जंगलसंपत्ती होय. जंगलाच्या वाढत्या संपत्तीमुळे या भागातील मनुष्याला उत्तम प्राणवायू मिळतो. आणि हेच जगण्याचे खरे वैभव असल्याचे विचार खानापूर जेएमएफसी न्यायालयाचे वरिष्ट दिवाणी न्यायाधीश पी. मुरली मनोहर रेड्डी यांनी व्यक्त केले.
रविवारी लोंढा येथे वनविभाग तसेच खानापूर तालुका कायदा साक्षरता समिती व वकील संघटनेच्या वतीने आयोजित कायदा साक्षरता शिबिरात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रारंभी लोंढा विभागाचे वन संरक्षण अधिकारी प्रशांत गौराणी यांनी, लोंढा भागातील जंगल संपत्तीचा आढावा मांडला.
या भागातील लोक जंगल संपत्तीला अधिक महत्त्व देत वन विभागाला मदत करतात. त्यामुळे वनखात्याला देखील अशा जंगल संपत्तीच्या वाढीला अधिक मदत मिळते, असे सांगितले.
प्रमुख अतिथी म्हणून कनिष्ट दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश एम. सूर्यनारायण यांनी यावेळी वन कायदा व आपली जबाबदारी याविषयी विचार मांडले. तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. ईश्वर घाडी यांनी प्रमुख वक्ते या नात्याने बोलताना, न्यायालय हे कायद्याचे मंदिर आहे. याठिकाणी सर्वांना न्याय मिळावा हीच प्रत्येकाची अपेक्षा असते. ती देण्याचे काम न्यायालय करते. प्रत्येकाने जननमरण नोंदी करणे, स्थावर प्रॉपर्टी मालमत्तेचे कायदेशीर जतन करणे, वारसा हक्क या बाबींवर लक्ष देणे गरजेचे असल्याचे विचार त्यांनी यावेळी मांडले. यावेळी जिल्हा पंचायत माजी सदस्य बाबुराव देसाई, ग्रा.पं. सदस्य विलास गावडे यासह ग्रामपंचायत सदस्य, वनखात्याचे कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.