वार्ताहर/ निपाणी
तोडून गेलेल्या उसाचा पाला जाळला जात असताना योग्य ती खबरदारी न घेतल्याने शेजारी असणाऱया शेतशिवारातील उसाला आग लागल्याची घटना रविवारी सकाळी 11 च्या सुमारास घडली. जत्राट येथे चेंडके मळय़ात घडलेल्या या घटनेत पाच शेतकऱयांचा 7 एकरातील ऊस जळून खाक झाला. यामुळे शेतकऱयांना सुमारे 10 लाखांच्या नुकसानीचा फटका बसला.
बाळकृष्ण भिमा चेंडके, अशोक सखाराम चेंडके, काशिम ईसाक मुजावर, शशिकांत कल्लाप्पा शिरोळे, महादेव खिलारे अशी नुकसानग्रस्त शेतकऱयांची नावे आहेत. घटनास्थळी अग्निशमन बंब पोहोचण्यासाठी रस्त्याची सोय नसल्याने परिसरातील शेतकऱयांनीच आग विझविण्यात यश मिळविले. जर आग आटोक्यात आणण्यात यश आले नसते तर अजूनही परिसरातील 10 ते 12 एकरातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला असता. घडलेल्या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
जत्राट येथे गेल्या आठवडय़ातच आगीची दुर्घटना घडताना शेतकऱयाचे नुकसान झाले होते. यामध्ये 4 एकरातील ऊस जळून खाक झाला होता. ही आग शॉर्टसर्किटने लागली. यामुळे शेतकऱयाचे मोठे नुकसान झाले. रविवारी घडलेली घटना ही तुटलेल्या उसाचा पाला जाळताना घडली आहे. या दोन्ही घटनेतील साम्य पाहता खबरदारी घेणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. कारखान्यांनीही अशी घटना घडताच उसाला त्वरित तोड देऊन विना तुट शेतकऱयांना त्याचे बिल अदा करणे गरजेचे आहे. त्यामुळे दुर्घटनेत जळालेल्या उसाची नुकसान भरपाई काही प्रमाणात मिळू शकते. महसूल विभागाने याचा सर्व्हे करून शेतकऱयांना मदत निधी मिळवून देणे आवश्यक आहे.