प्रतिनिधी /पणजी
भाजप सरकारने गोव्याला तसेच देशालाही देशोधडीला लावले आहे. प्रत्येक स्तरावर भाजप सरकार अपयशी ठरेल आहे असे कँग्रेस जाहिरनामा प्रमुख ऍड. रमाकांत खलप यांनी सांगितले. येत्या विधानसभा निवडणूकीसाठी राज्यातील जाणत्यांची मते विचारात घेऊनच जागिरनामा तयार करणार असल्याचेही ते म्हणाले. गोव्याचे रुप कसे असावा हे जनतेने ठरवावे त्यानुसार काँग्रेस पक्ष आपला जाहिरनामा तयार करणार असे खलप यांनी सांगितले.
येथील काँग्रेस कार्यालयात मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खलप बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत एल्वीस गोम्सही उपस्थित होते. आज राज्यात मोठय़ाप्रमाणात युवक उच्चशिक्षण घेत आहेत. परंतु त्याना रोजगार नाही. बेकारी वाढली आहे. भाजपने राज्यातील खाण व्यवसाय बंद केल्यामुळे खाम पटय़ातील लोकांवर उपासमारीची पाळी आली आहे. गोमंतीयांसमोर अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून जनता भाजपला कंटाळलेली आहे असेही खलप म्हणाले.
दर दिवशी जनते समोर नवनवीन संकटे उभी होत असतानाच सरकारने भूमीपूत्र विधेयक समंत करून नीज गोमंतकीयांच्या जमनी लुटण्याचा प्रकार सुरु केला आहे. सरकारने गोवा विक्रीसाठी काढला आहे. जनता हे खपवून घेणार नाही. असेही खलप म्हणाले. भाजप सरकारच्या स्वरूपात आज गोव्यावर मोठे अरीष्ठ आले आहे. दरम्यान युवा काँग्रेस आंदोलनकर्त्यावर केलेला लाठीचार्च निषेधार्थ आहे असे ऍड. खलप यांनी सांगितले. घटनेनुसार प्रत्येकाला आंदोलन करण्याचा हक्क आहे. जनतेचा आवाज बंद करण्यासाठी सरकार जे कृत्य करीत आहे ते निषेधार्थ आहे. युवा काँग्रेसवर केलेला लाठीचार्च तसेच त्यांना केलेली अटक याचा आपण निषेध करीत असल्याचेही खलप यांनी सांगितले.