कोगनोळी येथील शेतकऱयांचा इशारा : प्रांताधिकारी रविंद्र कर्लिंगनावर यांना निवेदन
वार्ताहर /कोगनोळी
राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाला कोणताही विरोध नाही. पण सहापदरीकरणासाठी लागणाऱया जागे व्यतिरिक्त अधिक जागा संपादित करण्यात येऊ नये. तसे झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा परिसरातील शेतकऱयांच्यावतीने देण्यात आला आहे. यावेळी शेतकऱयांनी प्रांताधिकारी रविंद्र कर्लिंगनावर यांना या संदर्भातील निवेदन दिले आहे. यावेळी निपाणीचे तहसीलदार डॉ. मोहन भस्मे व एनएचएआयचे अधिकारी हुक्केरीमठ उपस्थित होते.
निवेदनात, यापूर्वी महामार्गाच्या चारपदरीकरणासाठी शेतकऱयांची जमीन संपादित करण्यात आली आहे. आता महामार्गाचे सहापदरीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱयांची जमीन संपादीत करण्यात येणार आहे. शेतकऱयांचा सहापदरीकरणासाठी जमीन देण्यास विरोध नाही. पण त्याव्यतिरिक्त जादा जमीन हस्तगत करु नये. या ठिकाणी प्रकल्प उभारण्याच्या नावाखाली शेतकऱयांची जादा जमीन संपादित केली जाणार आहे. रयत संघटना कोगनोळी येथील शेतकऱयांच्या पाठीशी आहे. आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱयांना न्याय न मिळाल्यास उग्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच जादा जमीन संपादित केल्यास करनूर, वंदूर, शेंडूरसह अन्य गावांना पुराचा फटका बसण्याची शक्मयता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी रयत संघटनेचे पदाधिकारी, व्यापारी व शेतकरी उपस्थित होते.