जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी ; मंत्र्यांच्या हस्ते आज कामाचा शुभारंभ
प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिह्यात जलजीवन मिशनची कामे करण्यासाठी अधिकाऱ्यांनी त्या गावात जाऊन ग्रामसभा घेतल्या. आराखडे तयार कऊन घेतले. त्यांच्या मागणीनुसार सर्व्हे कऊन 1765 योजनांना मंजूरी देण्यात आली. त्यासाठी 815.92 कोटी इतका निधी मंजूर आहे. त्यापैकी ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषदकडील 810 योजनांसाठी 538.24 कोटी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन विभाग साताराकडील 34 योजनांसाठी 473. 14 कोटी व प्राधिकरण कराडकडील 15 योजनांसाठी 188.55 कोटी अशा 859 योजनांचे आज भूमीपूजन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिली.
जिल्हा परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, पाणी पुरवठा अभियंता सुनील शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना खिलारी म्हणाले, मी तीन गोष्टी नमूद करणार आहे. जलजीवन मिशनवर आम्ही काम करत आहोत. गावागावात जाऊन पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व्हे केला. ग्रामसभा घेवून लोकांची मते आजमावून घेतली. ा†जह्यातील 1765 योजनांना पूर्ण वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. त्यातील 859 योजना ऑन लाईन भूमी पूजन पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली दि. 8 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. यावेळी जिह्यातील मान्यवर लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे पुसेगालव आा†ण देगावला जाऊन भूमी पूजन करणार आहेत. या योजनांचे काम मिशन मोडवर पूर्ण केले जाणार आहे. गुणवत्ता तपासणी करण्यासाठी समांतर यंत्रणा काम करणार आहे. त्याचबरोबर ग्रामसमितीचेही लक्ष राहणार आहे. 2023 ला हे काम पावसाळ्यात पूर्ण होणार आहे, असा दावा त्यांनी केला. तसेच झरे पूनर्जीवन करण्याच्या कामासाठी सेस फंडातून 40 लाखाची तरतूद करण्यात आली आहे. 44 ठिकाणी कामे करण्यात येणार आहेत. तसेच पाणी पुरवठा योजनांना सोलर सिस्टिम करण्यात येणार आहे. 200 योजनांना ही सोलर सिस्टिम करण्यात येणार असून ही एक मोठी क्रांती आहे. त्यामुळे बील वाचणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
दहा वर्षांनतर क्रीडा स्पर्धा होणार
सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने दहा वर्षांनंतर क्रीडा स्पर्धा होत आहेत. त्या क्रीडा डा स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. तसेच घरकुल योजनेबाबतही पारदर्शक प्रक्रिया आहे. दिलेले उद्दीष्ठ गाठण्यासाठी आमचा प्रयत्न सुऊ आहे, असेही खिलारी यांनी सांगितले.