वृत्तसंस्था / नवी दिल्ली
उझ्बेकिस्तान येथे होणाऱया जलतरण स्पर्धेत सहभागी होणाऱया 13 जणांचा भारतीय जलतरणपटूंचा संघ सध्या बेंगलोरमध्ये सराव करीत आहे. दरम्यान कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याने या जलतरणपटूंना दिल्लीत हलविण्याचा निर्णय अखिल भारतीय जलतरण फेडरेशनने घेतला आहे.
उझ्बेकमधील ताश्कंद येथे 12 एप्रिलपासून आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेत भारताचे जलतरणपटू सहभागी होत आहेत. बेंगळूरमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढू लागला असून शासन जलतरण तलाव बंद करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जलतरणपटूंना दिल्लीला हलविण्यात येणार असल्याची माहिती फेडरेशनचे सरचिटणीस मोनल चोक्सी यांनी दिली आहे.