उन्हाच्या झळा होताहेत तीव्र : पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष, कोटय़वधी खर्च करूनही ग्रामीण भागात जलशुद्धीकरण कुचकामी
प्रतिनिधी / बेळगाव
केंद्र आणि राज्य सरकारने पिण्याच्या पाण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले आहेत. त्याचबरोबर तालुक्मयातील अनेक ठिकाणी जलशुद्धीकरण केंदे उभी केली आहेत. मात्र, त्यातील काही सुरू तर काही बंद आहेत. उन्हाच्या झळा तीव्र होत आहेत. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रांची डागडुजी करणे गरजेचे बनले आहे. मात्र, याकडे पाणीपुरवठा विभागाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. तेव्हा याकडे गांभीर्याने लक्ष देऊन जलशुद्धीकरण केंद्रांच्या डागडुजीसाठी प्रयत्न होण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोटय़वधी रुपये खर्चून ग्रामीण भागात जलशुद्धीकरण केंद्रांची स्थापना करण्यात आली. मात्र, काही ठिकाणी याकडे होत असलेले दुर्लक्ष, वेळेत त्यांची डागडुजी करण्यात आली नसल्याने पुढील काळात नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागणार यात शंका नाही. येत्या काळात उन्हाच्या झळा तीव्र होत असून पाण्यासाठी नागरिकांवर भटकंती करण्याची वेळ येणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी प्रयत्न करून जलशुद्धीकरण केंद्रे सुस्थितीत करावीत, अशी मागणी होत आहे.
एका जलशुद्धीकरण केंद्राला सुमारे 8 ते 10 लाख रुपये खर्च येतो. ‘पाणी वाचवा आणि पाणी जिरवा’ अशी घोषणा एकीकडे करण्यात येत आहे. आतापासून पाण्याच्या नियोजनासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. कोटय़वधी रुपये खर्च करण्यात आला आहे. सध्या जिल्हय़ात 400 हून अधिक केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. काही ठिकाणी भाडोत्री जागेत ही केंदे सुरू करण्यात आली असली तरी त्याचा फायदा नागरिकांना होताना दिसत आहे. काही नागरिकांच्या दुर्लक्षितपणामुळे ती कुचकामी झाली आहेत.
एक रुपया टाकल्यास 4 लीटर शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याच्या या शुद्धीकरण केंद्रांवर आता गर्दी होताना दिसत आहे. कोरोना काळात या केंद्रांचा वापर अधिक प्रमाणात झाल्याचे दिसून आले. पावसाळय़ात आणि हिवाळय़ात ग्रामीण भागातील अनेक केंदे कुचकामी ठरली असली तरी उन्हाळय़ात मात्र नागरिक याचा वापर करू लागले आहेत. काही ठिकाणी तर जलशुद्धीकरण केंद्रांवर गर्दी होताना दिसत आहे. त्यामुळे याचा लाभ नागरिकांना करून देण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने त्यांची डागडुजी करण्याची गरज आहे.
नागरिकांच्या आरोग्याचा व पाणी समस्येचा विचार करून ही जलशुद्धीकरण पेंदे उभारण्यात आली आहेत. नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे व यातूनच सरकारला फायदाही व्हावा असा हेतू ठेऊनच सरकारने ही केंदे सुरू केली आहेत. मध्यंतरी ही जलशुद्धीकरण केंदे वापरण्याकडे नागरिकांनी पाठही फिरविली होती. याला काही कारणेही आहेत.
खंडित वीज पुरवठय़ाचा फटका महत्त्वाचे म्हणजे या केंद्रांना करण्यात येणाऱया खंडित वीज पुरवठय़ाचा फटका, पाणी भरण्यासाठी गेले असता खंडित वीजपुरवठा झाल्याने काही केंदांवरील मशिनरी नादुरुस्त होत असल्याचे प्रकार व यासह इतर कारणांनी ही केंदे बंद अवस्थेत होती. आता नागरिकांना याची गरज समजली आहे. तेव्हा प्रत्येक ठिकाणी ही जलशुद्धीकरण केंद्रे सुरळीत करावीत, अशी मागणी होत आहे.