वार्ताहर / कास
परळी विभागातील खालची जळकेवाडी ता. सातारा येथे बांधण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे व नवीन नळजोडणीचे काम पाच वर्ष झाली तरी अदयाप अपुर्णच असुन हे काम केव्हा पुर्ण होऊन ग्रामस्थांना पाणी मिळणार कि नवीन टाकी व पाईप बघण्यासाठी शोपीस बनुन राहणार असा प्रश्न ग्रामस्थांना पडला असुन संबधीत अधीकारी व कॉन्ट्रक्टर यांची टक्केवारीमध्ये मिलीभगत झाली की काय त्यामुळे ते जाणीव पुर्वक दुर्लक्ष करत असल्याची माहीती ग्रामस्थांनी दिली आहे.
नळ पाणी पुरवठा राष्ट्रीय पेयजल योजनेतुन २०१५ साली पाटेघर ग्रामपंचायतीतील जळकेवाडी खालची येथे तेरा हजार लिटर पाणी साठवण क्षमतेची आर. सी. सी. पाण्याची साठवण टाकी व पाईप लाईन साठ ७ लाखाहुन आधिक निधी मंजूर झाला होता सदर पाण्याच्या टाकीचे काम तुषार जोशी नावाच्या कॉन्ट्रक्टरच्या लायसन वर जिवन मोरे नावाच्या सब ठेकेदाराने मिळवले होते.
सुरवातील या टाकीचे काम वाळुमध्ये केले असुन आर्ध्यहुन आधीक काम क्रश ( ग्रेट) मध्ये केले असुन ते निष्कृट दर्जाचे काम अडीच वर्षापुर्वी झाले आहे.सदर टाकी उभी केली असली तरी याटाकीवर अदयाप झाकण बसवीले नसुन झऱ्याचे पाणी पाईपमध्ये सोडण्यासाठी चेंबरही बांधला नसुन पाईप लाईन फिटींग केलेली अनेक ठिकाणी गंजून गेली आहे.काही ठिकाणी पाईप फिंटीगचे काम बाकी आहे.अदयाप या पाईप लाईन मधुन टाकी बांधल्यापासुन तिन वर्षात पाणीच पोहचले नसुन ग्रामस्थांची पाण्यासाठी टाकी असतानाही ससेहोलपट होत आहे.
गावात एखादे विकासकाम मिळवायचे झाल्यास शासनासह लोकप्रतिनीधींचे उंबरटे ग्रामस्थांना झिजवायला लागतात मात्र उबरंटे झिजवुन एखादे विकास काम गावात मिळल्यास ते आधीकाऱ्यांच्या जाणीवपुर्णक दुर्लक्षामुळे दर्जाहीन होत असुन ते पाच वार्षाहुन अधीकचा काळ उलटला तरी पुर्णही होत नसुन लोकांच्या उपयोगात येत नसल्याचा प्रकार जळकेवाडी येथे घडला आहे.काम पुर्ण झाल्यावर लागणार बोर्ड मात्र तिन वर्षापुर्वीच टाकीजवळ डामाडोलात उभा आहे. मात्र काम पुर्ण होऊन ते दर्जेदार झालेय काय याची खात्री करण्यास चार वर्षापासुन संबधीत एकही आधीकारी गावात फिरकलाच नसुन ऑफीसमध्ये बसुन टक्केवारी मिळवत बिले पास केल्याची माहीती ग्रामस्थ देत आहेत.
ग्रामस्थांनी ठेकेदार जिवन मोरे यांच्याशी विचारणा करता हो करू करतो एवढेच उत्तर पंचायत समीतीतील पाणीपुरवठा आधीकारी बाबर यांच्या ग्रामस्थांनी विचारणा केली असता हो सांगतो पुर्ण करायला सरपंच ग्रामसेवक हे तर टक्केवारीत मिलीभगत झाली असल्यासारखे आपली जबाबदारीच झटकत आहेत. त्यामुळे वरिष्ठ जिल्हा मुख्य आधीकारी व लोकप्रतिनिधी तात्काळ लक्ष घालुन संबधींतावर कार्यवाही करणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.