कार निर्मितीवर दबाव वाढण्याचे संकेत : रशियातून प्रकल्प हलविण्याची योजना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱया रशिया व युक्रेन यांच्यातील तणाव वाढत जात त्याचे रुपांतर युद्धजन्य परिस्थितीत झाले आहे. यामुळे या तणावपूर्ण स्थितीचा नकारात्मक परिणाम हा येत्या काळात विविध घटकांवर होणार असल्याचे भाकीत अभ्यासकांकडून व्यक्त केले जात आहे.
प्रामुख्याने रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा परिणाम हा युरोपीय आणि जागतिक बाजारातील वातावरण नकारात्मक करणारा असेल. यामध्ये ऑटोमोबाइल क्षेत्राचाही समावेश असणार आहे. वाहन निर्मिती करणाऱया कंपन्यांना मोठय़ा नुकसानीचा सामना करावा लागणार असल्याचे संकेत असून तज्ञांच्या माहितीनुसार वाहन क्षेत्रातील पुरवठा साखळी, उत्पादन आणि कर्मचारी संख्या यावर प्रभाव राहणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
वाहन उत्पादनांमधील कंपन्यांमध्ये फेक्सवॅगन, रेनॉ आणि टायर बनविणारी कंपनी नोकियन टायर्ससह अन्य कंपन्या युक्रेनकडून रशियावर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर उत्पादन बंद करुन आपले प्रकल्प अन्य ठिकाणी हलवण्याची योजना बनवत असल्याचे समजते. तसेच हय़ुंडाई आणि किया कंपन्या मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेत होते परंतु सध्या या कोरियन कंपन्यांचीही डोकेदुखी वाढलेली आहे.
रशिया पॅलेडियम धातुचा सर्वात मोठा पुरवठादार
दुसऱया बाजूला मात्र रशिया हा पॅलेडियम मेटलचा सर्वाधिक पुरवठादार असून या धातुचा वापर हा वाहनांमधून निघणाऱया विषारी गॅससारख्या कार्बन मोनोऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइडचा प्रभाव कमी करण्यासाठी केला जातो. सोबतच पेट्रोल आणि हायब्रिड वाहनांसाठी एक्झॉस्ट मोबाईल फोन, इलेक्ट्रिक उपकरणं, दाताचे उपचार, दागिने आदींकरीता या धातुचा वापर होतो. यामुळे याचा नकारात्मक परिणाम आगामी काळात भारतीय बाजारात पहावयास मिळणार असल्याचेही अभ्यासकांनी म्हटले आहे.
अनेक कंपन्यांनी स्थलांतर टाळले
युद्ध सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर रशियातील कंपन्यांनी जागतिक पातळीवर वाहन निर्मिती आणि स्थानिक डिलर्समार्फत स्थलांतर थांबविले आहे. तसेच ऑडी शेवर्लेला नोटिसही दिली आहे. फेक्सवॅगन आणि स्कोडाही याच तयारीत आहे. पोर्शे आणि टाटा समूह लँडरोव्हरनेही आपला प्रकल्प दुसरीकडे नेण्यासाठी सुरुवात केली आहे.
सेमीकंडक्टरच्या कमतरतेचा प्रभाव
कोरियाची कार बनविणारी कंपनी हय़ुंडाई आणि किया यांच्या उत्पादनावर प्रभाव पडत आहे. ईव्ही बॅटरीसह सेमीकंडक्टरचा पुरवठा थांबला जाण्याची समस्या निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात असून याचा परिणाम उत्पादनावर दिसेल.