-5 दिवसात 26 अहवाल पॉझिटिव्ह -नमुने तपासणीचे प्रमाण अत्यल्प
प्रवीण जाधव / रत्नागिरी
रत्नागिरी जिह्यात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा शासकीय रूग्णालयात 9 जून रोजी विषाणू प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. या लॅबमध्ये 5 दिवसात 284 स्वॅबची तपासणी करण्यात आली असून त्यातील 26 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ जिल्हय़ातील या लॅबमुळे वेगाने चाचणी होऊन तातडीने उपचार करणे अधिक सोपे जात आह़े मात्र नमुने तपासणीचे प्रमाण अत्यल्प असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आह़े
मागील 5 दिवसांचा विचार करता 9 जून रोजी 22 नमुने तपासण्यात आले. यामध्ये 2 पॉझिटिव्ह तर 20 निगेटिव्ह होत़े. 10 जून रोजी 46 नमुन्याची तपासणी झाली. यामध्ये 2 पॉझिटिव्ह, 44 निगेटिव्ह, 11 जून रोजी 93 पैकी 11 पॉझिटिव्ह, 82 निगेटिव्ह, 12 जून रोजी 101 पैकी, 10 पॉझिटिव्ह, 91 निगेटिव्ह, तर 13 जून रोजी 22 पैकी 1 पॉझिटिव्ह तर 21 निगेटिव्ह असल्याचे समोर आले आह़े जिह्यात यापूर्वी कोरोना चाचणी लॅब नसल्याने जिह्यातील नमुने मिरज व सांगली येथे पाठवण्यात येत होत़े मात्र, त्या ठिकाणी कामाला ताण असल्याने अहवाल येण्यास 4 ते 5 दिवसांचा कालावधी लागत होत़ा यामुळे रूग्णांवर उपचार करणे, क्वारंटाईन करणे आदी कामे विलंबाने होत होत़ी जिह्यातील काहीजणांचा मृत्यू झाल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याच्या घटनाही समोर आल्या होत्य़ा
ग्रीन झोन झालेला रत्नागिरी जिल्हा मुंबईकर चाकरमानी व परजिल्हय़ातून येणाऱया कोरोनाग्रस्तांमुळे रूग्णसंख्येत वाढ दिसून आल़ी त्यामुळे भविष्याचा विचार करता या ठिकाणी कोरोना तपासणी लॅब उभारण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली होत़ी त्याला प्रतिसाद देत राज्य शासनाकडून तातडीने या लॅबसाठी निधी मंजूर करण्यात आला होत़ा 9 जून रोजी या लॅबचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून करण्यात आले होत़े
सुमारे 1 कोटी 7 लक्ष रूपये खर्चून नव्याने सुरू करण्यात आलेली ही लॅब रत्नागिरीकरांसाठी सुरू करण्यात आली आह़े या लॅबमुळे परजिह्यावर अवलंबून राहण्याची परिस्थिती राहिलेली नाह़ी त्यामुळे कोरोना तपासणीच्या बाबतीत रत्नागिरी जिल्हा खऱया अर्थान आत्मनिर्भर झाला आह़े सध्या या लॅबचा वापर कोरोना संशयित रूग्णांसाठीच करण्यात येत असला तरी पॅन्सर, टिबी, एचआयव्ही टेस्टही या लॅबमध्ये करणे शक्य होणार आह़े जिह्यात वाढती कोरोना रूग्णांची संख्या पाहता ही लॅब रत्नागिरीकरांसाठी वरदान ठरत आह़े