राजकीय पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संयमाने वागा
सावंतवाडी/ प्रतिनिधी-
Covid-19 काळामध्ये गेले आठरा महिने समाजातील प्रत्येक नागरिक गोरगरीब जनता अनेक अडचणींना सामोरे जात आहे. ही प्रत्येक कुटुंबातील करते आप्तस्वकीय गमावलेले आहेत. काही कुटुंबात तर उद्ध्वस्त झाली आहे. कालच मालवणची बातमी वाचल्यानंतर मन अस्वस्थ झालं. अशा प्रकारच्या अनेक घटना जिल्ह्यामध्ये तसेच महाराष्ट्र मध्ये झालेले आहेत. करोनाने जिल्ह्यामध्ये कोणी ना कोणी आपला जीव गमवावाताहे. तरुण बेरोजगार झालेत. राडा संस्कृतीने जिल्ह्याने बघितली आहे. यामध्ये सत्यविजय भिसे, श्रीधर नाईक, गोवेकर, अंकुश राणे, सारखे राजकीय कार्यकर्ते गमावले आहेत. आता राडा संस्कृती जिल्ह्याला परवडणारी नाही. सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बसून सुवर्णमध्य काढावा तसेच वैद्यकीय सुविधा मजबूत करणे तरुणांना नोकऱ्या कशा उपलब्ध होतील याकडे लक्ष द्या, असे मत सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगांवकर यांनी मांडले.