प्रतिनिधी/ सातारा
भारतीय संविधानाने लोकांना जगण्याचा अधिकार दिलेला आहे. हा मुलभूत अधिकार आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी देण्यात आलेली मार्गदर्शक तत्त्वे लोक पाळत आहेत, अशावेळी लॉकडाऊन करून आपण नागरिकांच्या मुलभूत हक्कांची जाणूनबुजून पायमल्ली करीत आहात. नियमांचे पालन होत आहे की नाही, इतकेच आपण पाहू शकता, मात्र लॉकडाऊन करून लोकांची रोजीरोटी काढून घेवू शकत नाही. शासन, लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक आहेत आणि जनतेची सूचना त्यांनी पूर्ण केलीच पाहिजे. जनतेला तुम्हास जाब विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. याच अधिकाराचा वापर करून जिह्यातील लॉकडाऊन त्वरेने मागे घ्यावा, अशी मागणी ऍड. सीए. राजगोपाल द्रवीड यांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.