16 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट : नद्या-नाले तुडुंब : सतर्कतेचे आवाहन
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढला असून सोमवार तर मुसळधार पावसाने झोडपून काढले खारेपाटणमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून पुढील सलग चार दिवस (16 जुलैपर्यंत) मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्मयता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.
पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या 24 तासात 147 मि. मी. च्या सरासरीने जिल्हय़ात पाऊस पडला आहे. सर्वाधिक कणकवली तालुक्मयात 210 मि. मी. पाऊस पडला आहे. त्यामुळे कणकवली तालुक्मयात अनेक ठिकाणी नद्या-नाले तुडुंब भरून वाहत होते. खारेपाटण येथील सुखनदीला पूर आल्याने खारेपाटणच्या सखल भागात पाणी शिरले होते. तसेच जिल्हय़ाच्या अनेक भागातील छोटी-छोटी पुले पाण्याखाली गेली होती. तसेच घरे, गोठय़ांची पडझडही झाली आहे.
हवामान खात्याने 12 ते 16 जुलैपर्यंत अति ते अति मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हय़ातील नागरिकांनी सतर्क राहवे, असे आवाहनही जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.
मुसळधार पावसात पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी
आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा. घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या. अतिमुसळधार व अतिवृष्टीच्या परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी रहा व पायी अथवा वाहनाने प्रवास करू नका. घराबाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास निघण्यापूर्वी अधिकृत स्त्राsतांकडून हवामानाची, रेल्वेची व रस्ते वाहतुकीची आणि पाणी तुंबलेल्या ठिकाणांची माहिती करुन घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.